AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णा आता तरी उठा! पुण्यातील पोस्टरवरून अण्णा हजारे भडकले; म्हणाले, मी 90 व्या वर्षीही…

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलनासाठी ओळखले जातात. अशातच पुण्यात अण्णा हजारे यांचा फोटो असलेला एक बॅनर लावण्यात आला आहे. यावर अण्णांनी आता उत्तर दिले आहे.

अण्णा आता तरी उठा! पुण्यातील पोस्टरवरून अण्णा हजारे भडकले; म्हणाले, मी 90 व्या वर्षीही...
Anna Hajare
| Updated on: Aug 17, 2025 | 9:33 PM
Share

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आंदोलनासाठी ओळखले जातात. अशातच पुण्यात अण्णा हजारे यांचा फोटो असलेला एक बॅनर लावण्यात आला आहे. यावर ‘आता तरी उठा अण्णा, मतांची चोरी झाली आहे,’ असा मजकूल लिहिलेला आहे. अण्णांना याद्वारे आंदोलन करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र या बॅनरवरून अण्णा हजारे भडकले आहेत. वयाच्या 90व्या वर्षीही काम करावं का? असा प्रतिप्रश्न अण्णांनी केला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माझ्या प्रयत्नांमुळे 10 कायदे अस्तित्वात आले

पुण्यातील या बॅनरबाबत अण्णा हजारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना अण्णा म्हणाले की, ‘आतापर्यंत मी भरपूर काम केले आहे. भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आंदोलने केली आहेत. माझ्यामुळे या देशात दहा कायदे झाले. माहितीच्या अधिकाराचा कायदा माझ्यामुळे मिळाला. देशात मोठ्या प्रमाणात जागृती झाली. माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त असे कायदे माझ्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात आले आहेत.’

मी 90 व्या वर्षीही काम करायचं का?

पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, ‘आता माझं वय झालं आहे. मी 90 वर्षांचा झाल्यानंतरही काम करायचे आणि तुम्ही झोपून राहायचे? अशी जर कोणी अपेक्षा करत असेल तर ते चूकीचे आहे. माझ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा मागच्या काळात मी जे केले ते आजच्या तरुणांनी करावे असं विधान अण्णा यांनी बॅनर लावणाऱ्यांना केलं आहे.

तरुणांनी आता जागं व्हायला हवं – अण्णा हजारे

तरुणांना सल्ला देताना अण्णा म्हणाले की, ‘आजपर्यंत मी जे केलं, ते आता तरुणांनी करावं. त्यांचं या देशाप्रती कर्तव्य आहे. कारण तेही या देशाचे नागरिक आहेत. फक्त बोट दाखवून ‘हे करा, ते करा’ म्हणणं चुकीचं आहे. यातून काहीही साध्य होणार नाही. तरुणांनी आता जागं व्हायला हवं’ असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, अण्णा हजारे यांनी दिल्लीत 2012 साली लोकपाल विधेयकासाठी आंदोलन केलं होतं. मात्र त्यानंतर ते आंदोलनांपासून दूर आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.