AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अण्णा हजारे पुन्हा एकदा सक्रीय, या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी

Anna Hajarae: राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

अण्णा हजारे पुन्हा एकदा सक्रीय, या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी
Anna Hajarae
| Updated on: Feb 21, 2025 | 2:43 PM
Share

समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या ९० व्या दिवशी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. अण्णा हजारे यांनी आरोप होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. यावेळी अण्णा हजार यांनी कोणाचे नाव घेतले नाही, परंतु त्यांचा रोख आरोप होणाऱ्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचे दिसून येत आहे. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषीमंत्री असलेले शशिकांत सुतार, सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर, बबनराव घोलप, शोभा फडणवीस यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राज्य सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर एक प्रकारे प्रहार केल्याचे पाहायला मिळाले.

काय म्हणाले अण्णा हजारे

माध्यमांशी बोलताना अण्णा हजारे यांनी म्हटले की, मंत्रिमंडळात असलेल्या मंत्र्यांवर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून पहिले त्यांनी सर्वात प्रथम राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीची प्रतिमा चांगली होते. कारण जनता हे आपल्याला बघून अनुकरण करत असते. आरोप असणाऱ्या लोकांना मंत्रीमंडळात घेण्याआधी विचार करणे गरजेचे आहे. मंत्रिमंडळात घेताना कोणाला घेवू नये, हे सुद्धा ठरवले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

अण्णा हजारे मंत्र्यांना उद्देशून म्हणाले, तुम्हीच जर वाट सोडून चालला तर जनता कुठे जाणार? देश कुठे जाणार आहे. मंत्रिमंडळात असताना आरोप झाल्यावर एक क्षणसुद्धा पदावर राहू नये. लगेच राजीनामा दिला पाहिजे. आरोप होताच मंत्र्यांनी प्रथम राजीनामा देवून बाहेर पडले पाहिजे. माझे वय ९० वर्ष झाले आहे. या ९० वर्षांचा वयात एकसुद्धा डाग नाही. तसेच जीवन मंत्रिमंडळातील लोकांनी जगले पाहिजे. त्यामुळे राज्याचे आणि देशाचे नुकसान होते. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या लोकांना त्यांचे नेहमी आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजे. सुरवातीला हे चुकत आणि नंतर अशा घटना घडतात. त्यामुळे राज्याचे, देशाचे आणि समाजाचे नुकसान होते, त्याचा विचार करणे गरजेच असल्याची प्रतिकिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.