AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Obc reservation : ओबीसींच्या आरक्षणाचा ठाकरे सरकारकडून खेळखंडोबा, आशिष शेलारांची टीका

मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेला सुमारे 465 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. असा प्रत्येक टप्प्यावर ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला, असा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला.

Obc reservation : ओबीसींच्या आरक्षणाचा ठाकरे सरकारकडून खेळखंडोबा, आशिष शेलारांची टीका
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 4:43 PM
Share

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून कोर्टानं राज्य सरकारला दणका दिला आहे. त्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे सरकार कोर्टात कमी पडल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. तर आरक्षण न मिळण्यामागे भाजप कार्यकर्त्यांचाच हात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. ओसीबी आरक्षणावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनीही ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवालाय.

ओबीसींच्या आरक्षणाचा ठाकरे सरकारकडून खेळखंडोबा सुरु

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जो ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला, तो त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारला टिकवता आला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर सभागृहात सांगितले तातडीने मागासवर्ग आयोग नियुक्त करण्याची गरज आहे, तेव्हाही ठाकरे सरकारने ऐकले नाही. असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे. सदनामध्ये आम्ही आमदारांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आयोग नियुक्ती झाली, पण आयोगाची कार्यकक्षाच ठरवण्यात आली नाही. त्यानंतर इंपेरिकल डाटा गोळा करण्यात आला नाही. तर वारंवार केंद्र सरकारकडे जनगणनेतील माहिती मागत बसले. वास्तविक ही माहिती तत्कालीन काँग्रेस सरकारनेच बिनचूक जमा केली नाही. अशी टीकाही शेलार यांनी केली आहे.  सदोष माहिती असल्याचे त्याचवेळी स्पष्ट केले आहे. तरीही त्याच माहितीचा आग्रह करुन वेळ काढण्यात आला.

मगावर्ग आयोगाला निधी देण्यात आला नाही

तर मागासवर्ग आयोगाला अपेक्षित असलेला सुमारे 465 कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला नाही. असा प्रत्येक टप्प्यावर ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाचा खेळखंडोबा केला, असा आरोप पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार आशिष शेलार यांनी केला.

महापौराबद्दल बोललोच नाही त्याचा प्रसार सुरू

महापौरांबद्दल मी कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, ना कोणत्या महिलांबद्दल, माझी संपूर्ण पत्रकार परिषद न पाहताच ज्यांना कुठेच काही मिळत नाही, ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. सार्वजनिक आयुष्यात नितिमूल्य आणि नितिमत्ता पाळणारा मी आहे, शिवसेनेसारखा पाखंडी आणि खोटे पसरवणारा नाही. खोटे बोलणे आणि अपप्रचार ही भाजपची भूमिका नाही. जर कुठे तक्रार केली असेल तर त्यातून सत्यच समोर येईल. असंही शेलार म्हणाले आहेत.

Pune crime | पुण्यात फसवणूक प्रकरणी तीन नामांकित बिल्डरवर गुन्हा दाखल

उस्मानाबादेत एसटी बसवर दगडफेक, पोलीस बंदोबस्तातही बसच्या काचा फोडल्या

Mumbai : महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र, आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.