Mumbai : महापौर किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र, आशिष शेलार यांच्या त्या वक्तव्याविरोधात तक्रार
शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे.
मुंबई : मुंबईतल वरीळीत काही दिवसांपूर्वी सिलिंडरचा स्फोट झाला, त्यात आतापर्यंत एकूण तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका 4 महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. या स्फोटांच्या दुर्घटनेनंतर भाजपने आक्रमक होतं महापौरांवर टीकेची झोड उडवली. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महापौरावर टीका केली, मात्र शेलारांच्या या टीकेवरून आता प्रकरण तापलं आहे. शेलारांच्या टीकेवर महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक आल्या आहेत. त्यावरून त्यांनी तक्रार केली आहे.
किशोरी पेडणेकरांचं गृहमंत्र्यांना पत्र
मुंबईतल्या सिलिंडर स्फोटानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नायर रुग्णालयात रुग्णांन तात्काळ उपचार न करता ताटकळत ठेवल्याचा आरोप केला. यावेळी महापौरांवर टीका करताना. महापौरांना या घटनेची माहिती नव्हती का? 72 तासांनंतर महापौर रुग्णांच्या चौकशीसाठी पोहोचतात, 72 तास कुठे निजला होता? अशा शब्दात टीका केली होती. शेलारांच्या कुठे निजला होता? याच वाक्यावर आक्षेप घेत महापौरांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहीत तक्रार केली आहे. तसेच त्यांनी पोलिसांत तक्रार करत असल्याचंही म्हटलं आहे.
प्रथम नागरिक आणि महिला महापौरांबद्दल असे वक्तव्य चुकीचे
महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असतात. मी एक महिला महापौर आहे. माझ्याबाबत असे वक्तव्य चुकीचे आहे. असाही महापौरांनी पत्रात उल्लेख केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा तापलं आहे. या पत्रानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील काय भूमिका घेतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघर्ष वाढल्यानं त्याचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यावेळी आशिष शेलार यांनी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही खोचक टीका केली होती.