AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक सरपंच दहशतीमध्ये, थेट पोलिसांना सवाल? ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.

आणखी एक सरपंच दहशतीमध्ये, थेट पोलिसांना सवाल? ''माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?''
Kunal Patil
| Updated on: Dec 27, 2024 | 6:16 PM
Share

बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर नाही तर देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर उरण तालुक्यातील पागोटे या गावातील प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी सरपंच कुणाल पाटील यांच्यावर गाव गुंडांनी हल्ला केला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. परंतु त्यानंतर पोलिसांकडून त्या गुंडांना अटक होती. त्यामुळे सरपंच कुणाल पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणाचे उदाहरण देत प्रश्न विचारला आहे. ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”, असे त्यांनी म्हटले आहे.

काय घडला होता प्रकार

गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांना गावात फिरणेही मुश्कील झाले आहे. पागोटे गावचे शिवसेना सरपंच कुणाल पाटील यांनी या दहशतीविरोधात एल्गार पुकारला आणि जनजागृती मोहीम सुरू केली. त्यामुळे हे गुंड संतापले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी कुणाल पाटील यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. सुदैवाने ते त्यातून बचावले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे बघताच हल्लेखोर गुंडांनी पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर कुणाल पाटील न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींना अजून अटक नाही.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.

पागोटे या गावातील गावगुंड मोकाट आहे. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणाल पाटील म्हणाले, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहात काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. या गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले आहेय उरण तालुका ‘मस्साजोग’च्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पागोटेवासीयांना न्याय केव्हा मिळणार असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.