AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक सरपंच दहशतीमध्ये, थेट पोलिसांना सवाल? ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.

आणखी एक सरपंच दहशतीमध्ये, थेट पोलिसांना सवाल? ''माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?''
Kunal Patil
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 27, 2024 | 6:16 PM
Share

बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभर नाही तर देशभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर उरण तालुक्यातील पागोटे या गावातील प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी सरपंच कुणाल पाटील यांच्यावर गाव गुंडांनी हल्ला केला होता. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. परंतु त्यानंतर पोलिसांकडून त्या गुंडांना अटक होती. त्यामुळे सरपंच कुणाल पाटील यांनी संतोष देशमुख प्रकरणाचे उदाहरण देत प्रश्न विचारला आहे. ”माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघातय का?”, असे त्यांनी म्हटले आहे.

काय घडला होता प्रकार

गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थांना गावात फिरणेही मुश्कील झाले आहे. पागोटे गावचे शिवसेना सरपंच कुणाल पाटील यांनी या दहशतीविरोधात एल्गार पुकारला आणि जनजागृती मोहीम सुरू केली. त्यामुळे हे गुंड संतापले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी कुणाल पाटील यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. सुदैवाने ते त्यातून बचावले. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याचे बघताच हल्लेखोर गुंडांनी पळ काढला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर कुणाल पाटील न्यायालयात गेले. न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींना अजून अटक नाही.

शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या पागोटे ग्रामपंचायतीच्या सरपंच कुणाल पाटील यांनी हल्ल्यानंतर थेट उरण पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. मात्र त्याची गंभीर दखल न घेता अदखलपात्र तक्रार दाखल करून घेत गावगुंडांना खुलेआम फिरण्याची जणू संधीच दिली होती.

पागोटे या गावातील गावगुंड मोकाट आहे. त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे कुणाल पाटील म्हणाले, माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघत आहात काय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पागोटे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. या गावगुंडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ कमालीचे घाबरले आहेय उरण तालुका ‘मस्साजोग’च्या वाटेवर जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पागोटेवासीयांना न्याय केव्हा मिळणार असा, प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Follow Us
नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर
Gokul Gite | नाशिकचा तिढा कायम! फडणवीस-शिंदेंच्या चर्चेनंतरही गोकुळ गिते निवडणुकीवर ठाम
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष