AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी

वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे.

Nashik| मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी
नाशिकमध्ये हल्ल्यात जखमी झालेला दीपक वाघमारे.
| Edited By: | Updated on: Dec 14, 2021 | 12:33 PM
Share

नाशिकः वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली म्हणून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना आडगाव परिसरात घडल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपक वाघमारे या तरुणावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये खून, हल्ला आणि दरोड्याचे प्रकार सतत घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, गुन्हेगारीला आळा घालावा, अशीच मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.

संशयित हल्लेखोराला बेड्या

नाशिकमधील आडगाव परिसरात दीपक वाघमारे या तरुणाने वाढदिवस असलेल्या मित्राला मिठी मारली. त्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, तिथे असलेल्या इतरांना हा प्रकार रुचला नाही. त्यातल्या दोघांनी दीपकवर प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे दीपक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, अतिशय किरकोळ कारणावरून हा हल्ला केल्याने नाशिकमधील गुन्हेगारी कशा पद्धतीने वाढत आहे, हेच पुन्हा एकदा समोर आले आहे.

खुनानंतर हल्ले, दरोडे

नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी एकाच आठवड्यात सलग तीन खून झाले. त्यानंतर सलग दोन दरोडे पडले. इतकेच नाही तर दोन दिवसांपूर्वीही नाशिकमधील सुप्रसिद्ध शिल्पकार मंदार गर्गे यांच्या स्टुडिओवर दरोडा पडला. दरोडेखोरांनी कोयत्याचा धाक दाखवून महापुरुषांच्या पुतळ्यातील तब्बल 1400 किलोच्या ब्राँझ धातूची लूट केली आहे. त्यात सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या दरोडोखांना मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यानंतर ही घटना घडली आहे.

हैदोस थांबवावा

नाशिकची प्रचंड वेगाने क्राईमनगरीकडे सुरू असलेली वाटचाल कधी थांबणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक करत आहेत. एकीकडे हे सर्व सुरू असताना शहराचे पोलीस आयुक्त फक्त हेल्मेटसक्ती हा एकच मुद्दा रेटून धरत आहेत. त्यांनी या घटनांकडेही लक्ष द्यावे. उद्योगनगरीतील गुन्हेगारांचा हैदोस थांबवावा, अशी मागणी होत आहे. एकदा नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढली, तर उद्योग पाठ फिरवतील, अशी भीतीही व्यक्त होत आहे. हे पाहून पोलिसांनी काही तरी पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

Nashik | 6 नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत फाटाफूट; 311 उमेदवार रिंगणात

Omicron जनजागृती; ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षांची चक्क नाशिक ते शिर्डी 90 किमीची धाव, 6 वर्षांपासून उपक्रम

Nashik| बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.