AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lockdown in Aurangabad | औरंगाबादेत लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

औरंगाबादेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. (lockdown in aurangabad)

Lockdown in Aurangabad | औरंगाबादेत लॉकडाऊन जाहीर, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 27, 2021 | 7:58 PM
Share

औरंगाबाद : राज्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. औरंगाबाद शहर आणि इतर तालुक्यांतसुद्धा कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियम लागू करण्यात आले असले तरी येथे कोरोनाला थोपवण्यात यश येत नाहीये. ही परिस्थिती पाहता येथील प्रशासनाने आता औरंगाबादेत लॉकडाऊन (lockdown in Aurangabad) लागू केला आहे. 30 मार्च ते येत्या 8 एप्रिलपर्यंत हा निर्णय लागू असेल. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. (Aurangabad administration announced lockdown in Aurangabad due to increase in Corona patient)

30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

मागील काही दिवासांपासू राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादेतही कोरोना रुग्णांमध्ये रोज मोठी वाढ होत आहे. येथे बाजारपेठ, तसेच इतर सामान खरेद करण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्यामुळे रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त औरंगाबाद मनपा क्षेत्रात हजारो रुग्ण रोज आढळत आहेत. शुक्रवारी दिवसभरात 1500 पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद केली गेली. ही परिस्थिती गंभीर असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत होते. या पार्श्वभूमीवर आता येथील प्रशासनाने कडक पवित्रा धारण केला असून येथे थेट लॉकडाऊन जाहीर केला आहे. येत्या 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन लागू असेल. या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अंशत: लॉकडाऊनचा कोणताही परिणाम नाही

औरंगाबादेत येत्या 15 फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी औरंगाबादमध्ये येत्या 11 मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला  होता.  मात्र, तरीदेखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कोणतीही कमी झाली नाही.  त्यानंतर आता संपूर्ण लॉकडाऊनचा येथील प्रशासनाने निर्णय घेतला.

राज्य सरकारकडून नव्या गाईडलाईन्स जारी

दरम्यान, राज्य सरकारने कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सरकारने नियम आणखी कडक केले असून नागरिकांनी नियमांच्या अधीन राहूनच सर्व कामे करावीत असे आवाहन केले आहे. नव्या गाईडलाईन्स नुसार राज्यात  आजपासून रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू असेल. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून राज्यात सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत मिशन बिगीन अगेनचे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

इतर बातम्या :

सार्वजनिक उद्यानं, समुद्र किनारे रात्री बंद, हॉटेलची पार्सल व्यवस्था सुरु, राज्यात काय सुरु काय बंद, नव्या नियमावलीत निर्बंध काय?

तुम्हाला आलेला झटका म्हणजे नियम नको; राज्यातील जमावबंदीला भाजपचा विरोध

लॉकडाऊन नाही, पण, आजपासून राज्यभर जमावबंदी, रात्री 8 नंतर ‘या’ गोष्टींना ‘बंदी’; गाईडलाईन जारी

(Aurangabad administration announced lockdown in Aurangabad due to increase in Corona patient)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.