AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | संभाजीनगर नामांतराचा मुद्दा दिल्लीत जाणार, संतप्त काँग्रेस पदाधिकारी सोनिया गांधींसमोर गाऱ्हाणं मांडणार

Aurangabad name Sambhajinagar | औरंगाबादचं नाव बदलण्यावरून स्थानिक काँग्रेस नेते वरिष्ठांची तक्रार दिल्लीत सोनिया गांधींकडे करणार

Aurangabad | संभाजीनगर नामांतराचा मुद्दा दिल्लीत जाणार, संतप्त काँग्रेस पदाधिकारी सोनिया गांधींसमोर गाऱ्हाणं मांडणार
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 10:24 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्यावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदावर असताना शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राज्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या प्रस्तावाच्या परवानगीस विरोध केला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. औरंगाबादकरांना विचारात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला. सत्तेतील काँग्रेसचे नेतेही हे घडताना मौनात का गेले होते, असा सवाल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे. स्थानिक काँग्रेसचे नेते औरंगाबादच्या नामांतराचा हा मुद्दा आता दिल्लीत नेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची लवकरच ते भेट घेणार आहेत.

राज्यस्तरीय काँग्रेस नेत्यांकडून प्रतिसाद नाही

उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शहरातील बहुतांश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर वरिष्ठ मंत्र्यांसमोरही आपली नाराजी दर्शवली. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते राज्यातील काँग्रेस नेत्यांचं गाऱ्हाणं घेऊन दिल्लीत जाणार असल्याची माहिती हाती आली आहे

बकरी ईदनंतर दिल्लीवारी

औरंगाबादचे स्थानिक नेते बकरी ईद झाल्यानंतर दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जुलै या दिवशी बकरी ईद आहे. त्यानंतर शहरातील काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेणार आहेत. शहरातील काँग्रेस पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘ औरंगजेबानं स्वतःच्या वडलांचाही खून केल्याची इतिहासात नोंद आहे. हा विषय कुठल्या समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दलच्या भावनांवरून सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही हीच इच्छा होती. म्हणून आम्ही काहीही विरोध केला नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना केलं.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.