AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | संभाजीनगर नामांतराचा मुद्दा दिल्लीत जाणार, संतप्त काँग्रेस पदाधिकारी सोनिया गांधींसमोर गाऱ्हाणं मांडणार

Aurangabad name Sambhajinagar | औरंगाबादचं नाव बदलण्यावरून स्थानिक काँग्रेस नेते वरिष्ठांची तक्रार दिल्लीत सोनिया गांधींकडे करणार

Aurangabad | संभाजीनगर नामांतराचा मुद्दा दिल्लीत जाणार, संतप्त काँग्रेस पदाधिकारी सोनिया गांधींसमोर गाऱ्हाणं मांडणार
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 10:24 AM
Share

औरंगाबादः औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर (sambhajinagar) करण्यावरून स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदावर असताना शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) राज्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या प्रस्तावाच्या परवानगीस विरोध केला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. औरंगाबादकरांना विचारात न घेता परस्पर हा निर्णय घेण्यात आला. सत्तेतील काँग्रेसचे नेतेही हे घडताना मौनात का गेले होते, असा सवाल स्थानिक काँग्रेस नेत्यांनी केला आहे. स्थानिक काँग्रेसचे नेते औरंगाबादच्या नामांतराचा हा मुद्दा आता दिल्लीत नेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची लवकरच ते भेट घेणार आहेत.

राज्यस्तरीय काँग्रेस नेत्यांकडून प्रतिसाद नाही

उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर शहरातील बहुतांश काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर वरिष्ठ मंत्र्यांसमोरही आपली नाराजी दर्शवली. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा त्यांना काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे स्थानिक काँग्रेस नेते राज्यातील काँग्रेस नेत्यांचं गाऱ्हाणं घेऊन दिल्लीत जाणार असल्याची माहिती हाती आली आहे

बकरी ईदनंतर दिल्लीवारी

औरंगाबादचे स्थानिक नेते बकरी ईद झाल्यानंतर दिल्लीत जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जुलै या दिवशी बकरी ईद आहे. त्यानंतर शहरातील काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेणार आहेत. शहरातील काँग्रेस पदाधिकारी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘ औरंगजेबानं स्वतःच्या वडलांचाही खून केल्याची इतिहासात नोंद आहे. हा विषय कुठल्या समाजापुरता मर्यादित नाही. हा विषय संभाजी महाराजांबद्दलच्या भावनांवरून सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचीही हीच इच्छा होती. म्हणून आम्ही काहीही विरोध केला नाही, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये बोलताना केलं.

Follow Us
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक
जनतेला नियम आणि स्वतःला सूट?; मोदींच्या बचत आवाहनावर दमानिया आक्रमक.
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख...
मोठी बातमी! आणखी एक MIM नेता कचाट्यात, गोवंश तस्करी प्रकरणी 3 लाख....
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राहुल गांधी आक्रमक; थेट म्हणाले. हे....
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार
मुंबईत उष्णतेचा कहर; सलग तिसऱ्या दिवशी तापमान 35 अंशांच्या पार.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक...
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले......
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?.
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया.
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा...
171 लिंक अन् थेट पीडितेच्या घरी जाऊन... TCS धर्मांतरण प्रकरणात नवा....
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग
सुषमा अंधारे आज हक्कभंग कारवाईला सामोरं जाणार; राजकीय घडामोडींना वेग.