AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gopichand Padalkar | अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवू द्या, गोपीचंद पाडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगरच्या नामांतरावरून गोपीचंद पडळकरांनी अशी मागणी केली. मात्र नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी मात्र पडळकरांच्या या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे.

Gopichand Padalkar | अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाही हे दाखवू द्या, गोपीचंद पाडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 12:36 PM
Share

अहमदनगरः अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. स्वाभिमानी मुख्यमंत्री  (CM Uddhav Thackeray)असाल जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय तत्काळ घ्या आणि आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे सिद्ध करा, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. अहमदनगर येथे अहिल्याबाई होळकरांचा (Ahilyabai Holkar) जन्म झाला होता.  त्यामुळे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याला त्यांचं नाव देण्याची मागणी पडळकरांनी केली आहे. यांसदर्भातील एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचंही पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच चौंडी येथे भक्तांना अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केला.

काय म्हणाले गोपीचंद पडळकर?

गोपीचंद पडळकरांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘ शेकडो हिंदुंचा बळी घेणाऱ्या मुंबई ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक व्यवहार करणारे नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखलं. हिंदू राजमाता जयंती म्हणजे यांना नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो? जेव्हा हिंदु मंदिरं लुटली जात होती, तेव्हा अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्यादेवी प्रेमींची भावना आहे की, अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे.’

स्वाभिमानी असाल तर…

अहमदनगरच्या नामांतराचा तातडीनं निर्णय घ्यावा, असा इशाराही गोपीचंद पाडळकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ हा निर्णय तातडीनं घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे दाखवून द्या. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान कराल, ही अपेक्षा आहे. अन्यथा हा बहुजन समाज जागा झालाय आणि संघटित झालाय, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय.

‘नामांतरापेक्षा शेतकरी प्रश्नी लक्ष घाला’

अहमदनगरच्या नामांतरावरून गोपीचंद पडळकरांनी अशी मागणी केली. मात्र नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी मात्र पडळकरांच्या या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. कुठेतरी जातीपातीचं भावनेचं राजकारण करण्यापेक्षा आज राज्यातील शेतकरी अडचणींचा सामना करतोय हे प्रश्न दिसत नाहीत का..? असा सवाल उपस्थित केलाय.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.