AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाविकास आघाडी आज राज्यात, उद्या देशातही होऊ शकते’, काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांचं वक्तव्य

आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आता मोठं विधान केलंय. राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्याता आहे. असे विधान अमित देशमुख यांनी केलंय.

'महाविकास आघाडी आज राज्यात, उद्या देशातही होऊ शकते', काँग्रेस मेळाव्यात मंत्री अमित देशमुख यांचं वक्तव्य
वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य खात्याचे कॅबिनेट मंत्री अमित देशमुखImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Mar 01, 2022 | 4:54 PM
Share

औरंगाबाद : गेल्या विधानसभेवेळी राज्यात जे घडलं त्याने देशाला तोंडात बोट घालायला लावलं. कारण मोदी (Pm Modi) आणि शहांच्या (Amit Shah) ताकदीला राज्यात पवारांची युक्ती भारी पडली. शिवसेना आणि भाजपचा तीन दशकांचा घरोबा संपला आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) तयार झाली. त्यामुळे आमदारांची शंभरी पार करूनही भाजप सत्तेपासून वंचित राहिली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा गाजलेला पाहटेचा शपथविधीही काही तासात पवारांनी फेल केला. गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. यावरूनच आता काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आता मोठं विधान केलंय. राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्याता आहे. असे विधान अमित देशमुख यांनी केलंय. त्यामुळे पुन्हा जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

राहुल गांधी नेतृत्व करतील

राज्यात महविकास आघाडी झाली आहे, तशीच उद्या देशातही महविकास आघाडी होऊ शकते आणि त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतील असं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलं आहे. त्यामुळे सर्वाच्याच भुवया उचावल्या आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे स्वबळाचा नारा आणि दुसरीकडे देशात युतीचं विधान त्यामुळे कार्यकर्तेही काही काळ कनफ्यूज झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपूर्वीच तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात दाखल होत मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसशिवाय देशात तिसरी आघाडी होणार नाही असा सूर काँग्रेस नेत्यांनी लावल्याचे दिसून आले.

संभाजी राजेंबाबातही स्पष्टीकरण

येत्या काही दिवसातच राज्यात विविध निडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहे. अनेक दौरे करत महाराष्ट्र पिंजून काढत आहे. त्यामुळे अमित देशमुख म्हणाले, उन्हाळ्यात, पावसाळ्यात महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील. त्याची तयारी चांगली करा. तसेच संभाजीराजेंच्या आंदोलनाबद्दल बोलताना, छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण सोडलं आहे, त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संभाजी राजे हे महविकास आघाडी सोबत येऊन काम करायला तयार आहेत. असं वक्तव्य अमित देशमुख यांनी केलं होतं, मात्र यावरून स्पष्टीकरण देताना त्यांनी मागण्यांची पूर्तता होईपर्यंत संभाजी राजे सोबत काम करायला उत्सुक आहेत, असं स्पष्ट केलं आहे.

Video – पायाला भेगा, हाताला घट्टे हेच शेतकऱ्याच्या मुलीचे सौंदर्य, अमरावतीच्या पालकमंत्री ठाकूर यांनी टीकाकारांना सुनावले

भाजप नेत्यांवर कारवाई केली नाही म्हणून नगराळेंची उलचबांगडी?; वाचा पडद्यामागे काय घडलं?

पवारांच्या मेहरबानीवर ठाकरेंचे सुरू, राज्यपाल चुकतील असे वाटत नाही; राणेंचा दावा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.