AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समृद्धी’वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील जांभाळा गावातील टोल प्लाझाचे काम जवळपास पूर्ण झालेले असून त्याचे डिझाइन अतिशय आकर्षक आहे. पंख पसरलेल्या पक्ष्याचा आकार असलेली ही वास्तू येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

'समृद्धी'वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य
समृद्धी महामार्गावरील औरंगाबाद येथील जांभळा गावातील टोल प्लाझा
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:02 AM
Share

औरंगाबादः नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) औरंगाबाद जवळील माळीवाडा (Aurangabad Maliwada) शेजारी असलेल्या जांभळा गावातील टोल प्लाझाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या टोल प्लाझाचे डिझाइनच एवढे आकर्षक आहे की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तो लक्ष वेधून घेत आहे. या वास्तुकडे पाहिलं की, जणू काही सुंदर पंख पसरलेला पक्षीच आहे, असा भास होतो. हा टोलनाका एकूण 10 लेनचा असेल.

समृद्धीवर दर 30 किमीवर इंटरचेंज

नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर जवळपास प्रत्येक 30 किमी अंतरावर इंटरचेंज आहे. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात येत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर कुठेही टोल नाका नसेल, मात्र समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच हे टोलप्लाझा उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गासारखे ठराविक अंतरावर गेल्यावर येथे टोल भरण्याची गरज नाही.

टोल भरताना फसवणूक चालणार नाही

समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच टोल भरावा लागेल. त्यानंतर रस्त्यात कुठेही टोलनाके नाहीत. समजा औरंगाबादहून तुम्हाला नाशिकला जायचे असेल तर औरंगाबादच्या टोलवरच नाशिकपर्यंतचा टोल भरावा लागेल. नाशिकला गेल्यानंतर समृद्धी महामार्ग सोडताना तेथील इंटरचेंजला औरंगाबादमध्ये भरलेल्या टोलची तपासणी होईल. पण एखाद्या वाहनधारकाने औरंगाबादहून समृद्धीवर जाताना शिर्डीला जायचे, असे सांगून शिर्डीपर्यंतचा टोल भरला आणि प्रत्यक्षात तो शिर्डीऐवजी पुढे नाशिकपर्यंत गेला तर नाशिकच्या इंटरचेंजवर त्या वाहनधारकाला दंड भरावा लागेल.

मार्गावर एकदाच भरावा लागणार टोल

देशीतल इतर राष्ट्रीय महामार्गांची प्रणाली पाहता, तेथे फास्टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांना थांबण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, समृद्धी महामार्गावर फास्टॅगची व्यवस्था नसेल. कारण या मार्गावर बसचे तिकीट काढल्यासारखा पुढील प्रवासाचा टोल भरावा लागणार आहे.

इतर बातम्या-

Alert: मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला, तापमानातही अचानक वाढ, वाचा काय सांगतात नोंदी, कोणती आहेत कारणं?

Follow Us
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब
भाजप मोर्चामुळे वाहतूक कोंडी; संतप्त महिलेचा मंत्री महाजनांना थेट जाब.
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये
मोठी बातमी! नाशिकनंतर पुण्यातही कॉर्पोरेट जिहाद? ऑफिसच्या रेस्टरूमध्ये.