AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘समृद्धी’वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील जांभाळा गावातील टोल प्लाझाचे काम जवळपास पूर्ण झालेले असून त्याचे डिझाइन अतिशय आकर्षक आहे. पंख पसरलेल्या पक्ष्याचा आकार असलेली ही वास्तू येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

'समृद्धी'वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य
समृद्धी महामार्गावरील औरंगाबाद येथील जांभळा गावातील टोल प्लाझा
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 11:02 AM
Share

औरंगाबादः नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) औरंगाबाद जवळील माळीवाडा (Aurangabad Maliwada) शेजारी असलेल्या जांभळा गावातील टोल प्लाझाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या टोल प्लाझाचे डिझाइनच एवढे आकर्षक आहे की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तो लक्ष वेधून घेत आहे. या वास्तुकडे पाहिलं की, जणू काही सुंदर पंख पसरलेला पक्षीच आहे, असा भास होतो. हा टोलनाका एकूण 10 लेनचा असेल.

समृद्धीवर दर 30 किमीवर इंटरचेंज

नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर जवळपास प्रत्येक 30 किमी अंतरावर इंटरचेंज आहे. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात येत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर कुठेही टोल नाका नसेल, मात्र समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच हे टोलप्लाझा उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गासारखे ठराविक अंतरावर गेल्यावर येथे टोल भरण्याची गरज नाही.

टोल भरताना फसवणूक चालणार नाही

समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच टोल भरावा लागेल. त्यानंतर रस्त्यात कुठेही टोलनाके नाहीत. समजा औरंगाबादहून तुम्हाला नाशिकला जायचे असेल तर औरंगाबादच्या टोलवरच नाशिकपर्यंतचा टोल भरावा लागेल. नाशिकला गेल्यानंतर समृद्धी महामार्ग सोडताना तेथील इंटरचेंजला औरंगाबादमध्ये भरलेल्या टोलची तपासणी होईल. पण एखाद्या वाहनधारकाने औरंगाबादहून समृद्धीवर जाताना शिर्डीला जायचे, असे सांगून शिर्डीपर्यंतचा टोल भरला आणि प्रत्यक्षात तो शिर्डीऐवजी पुढे नाशिकपर्यंत गेला तर नाशिकच्या इंटरचेंजवर त्या वाहनधारकाला दंड भरावा लागेल.

मार्गावर एकदाच भरावा लागणार टोल

देशीतल इतर राष्ट्रीय महामार्गांची प्रणाली पाहता, तेथे फास्टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांना थांबण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, समृद्धी महामार्गावर फास्टॅगची व्यवस्था नसेल. कारण या मार्गावर बसचे तिकीट काढल्यासारखा पुढील प्रवासाचा टोल भरावा लागणार आहे.

इतर बातम्या-

Alert: मुंबईच्या हवेचा दर्जा घसरला, तापमानातही अचानक वाढ, वाचा काय सांगतात नोंदी, कोणती आहेत कारणं?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.