AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | आता बांधकामासाठी शुद्ध पाण्याच्या वापरावर बंदी, औरंगाबाद मनपा प्रशासकांचा मोठा निर्णय !

उन्हाळ्यात हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवार, शनिवारी सिडको भागातील नागरिकांनी अशाच प्रकारे संताप व्यक्त करत चोवीस तासांपेक्षा जास्त आंदोलन केले. त्यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

Aurangabad | आता बांधकामासाठी शुद्ध पाण्याच्या वापरावर बंदी, औरंगाबाद मनपा प्रशासकांचा मोठा निर्णय !
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 09, 2022 | 3:06 PM
Share

औरंगाबादः शहरात (Aurangabad city) दिवसेंदिवस पाण्याची वाढती मागणी पाहता, महापालिका (Aurangabad municipal corporation) आयुक्तांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना आता बांधकामाच्या ठिकाणी शुद्ध पाणी वापरता येणार नाही. बांधकामासाठी महापालिकेने नळाद्वारे सोडलेले शुद्ध पाणी वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. बांधकामासाठी इतर स्रोतांतील (water sources) अशुद्ध पाणी वापरण्यात यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरातील पाणीप्रश्न गंभीर होत असून विविध भागातील नागरिकांना दर आठ दिवसांनी पाणी पुरवठा होतो.उन्हाळ्यात हा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवार, शनिवारी सिडको भागातील नागरिकांनी अशाच प्रकारे संताप व्यक्त करत चोवीस तासांपेक्षा जास्त आंदोलन केले. त्यानंतर पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत.

आजचा निर्णय काय?

औरंगाबाद मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शहरातील बांधकामासाठी आजपासून शुद्ध पाण्याच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. बांधकामासाठी फक्त अशुब्ध पाणी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास स्विमिंग पूल आणि कमर्शिअल वापरावरही बंधने आणणार असल्याचा इशारा मनपा प्रशासकांनी दिला आहे. तसेच सामान्य नागरिकांनाही पाण्याचा गैरवापर थांबवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. असा गैरवापर करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी केले.

हर्सूल तलावातून अतिरिक्त पाण्याचा उपसा

दरम्यान, शहरातील हर्सूल तलावातून दररोज 6 एमएलडी पाणी उपसा केला जातो. शहरातील काही भागाला यातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढल्याने हर्सूल तलावातून अतिरिक्त पाणीउपसा करण्याची योजना मनपाने आखली आहे. आज सोमवार 09 मे पासून अतिरिक्त पाणी उपशासाठी सुरुवात होत असून यासाठीचे पाइपही आणण्यात आले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात यासाठीची सोय होईल. यानंतर हर्सूल तलावातून दररोज 8 ते 10 एमलडी पाणी उपसा करण्याची महापालिकेची योजना आहे.

Follow Us
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली