AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Corona: विदेशातून आलेल्यांच्या महापालिकेचा दट्ट्या, 24 दिवसात आले एक हजार नागरिक!

देशात आणि राज्यात वाढता ओमक्रॉनचा प्रसार पाहता औरंगाबादेतही प्रशासन अलर्ट आहे. विदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागावर महापालिका असून पालिकेच्या वॉर रुममधून त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. तरीही यातील बरेच जणा नॉट रिचेबल आहेत.

Aurangabad Corona: विदेशातून आलेल्यांच्या महापालिकेचा दट्ट्या, 24 दिवसात आले एक हजार नागरिक!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 25, 2021 | 10:23 AM
Share

औरंगाबादः विदेशी प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना ओमिक्रॉनची बाधा असल्याचे राज्यातील उदाहरणांवरून दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिका शहरात आलेल्या प्रत्येक विदेशी नागरिकाच्या मागावर आहे. मागील 24 दिवसात शहरात 1 हजार 40 नागरिक आले. त्यापैकी 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून 56 जणांचा शोध अद्याप लागला नाही.

1 डिसेंबरपासून सक्तीने विदेशींची चाचणी

शहरात ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेत आहे. त्यामुळे 1 डिसेंबरपासून विदेशातून येणारे पर्यटक आणि प्रवाशांची सक्तीने कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत विदेशातून 1 हजार 40 प्रवासी शहरात दाखल झाले आहेत. त्यापैकी बाहेरदावी गेलेले 31 प्रवासी असून दुबार नावे असलेले 20 प्रवासी आहेत. मनपाच्या वॉर रुममधून संपर्क करण्याचा प्रयत्न केला तरी 107 प्रवाशांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच 56 प्रवाशांचा शोध अद्याप लागला नाही.

आतापर्यंत 771 प्रवासी निगेटिव्ह

आतापर्यंत 771 प्रवाशांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. एक प्रवासी मुंबईतच ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने त्याला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्या प्रवाशांसोबत औरंगाबादेत आलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. तसेच विदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये 33 मुलांचा समावेश आहे. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. तसेच सहा प्रवासी ग्रामीण भागातील असून त्यांचीही चाचणी झालेली नाही. 54 प्रवाशांची चाचणी आणखी सात दिवसांनी करण्यात येणार आहे.

इतर बातम्या-

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

TET Exam Scam| टीईटी परीक्षा महाघोटाळा ; आरोपी तुकाराम सुपेच्या घरी आढळले आणखी पाच लाख

Follow Us
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्ये रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक
माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
Devendra Fadnavis | माणसं प्रेमाने जिंकता येतात!; सुप्रिया सुळेंच्या आव्हानावर फडणवीसांचा पलटवार
अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदार...
Video | अरे... ऐ मला हे चालणार नाही... बैठकीत एकाऐकी मुख्यमंत्री कंत्राटदारांवर भडकलेच, पाहा व्हिडीओ
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?
1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार