Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 6:00 AM

औरंगाबादः मागील अनेक वर्षांपासून ज्या रेशन कार्डधारकांनी (Ration card) धान्य घेतलेले नाही. तसेच त्यांनी कुठेही नोंद अपडेट होत नाही, अशा खातेधारकांची नावे रद्द करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) असे 14 हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. देशभरात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कार्ड अॅक्टिव्ह न ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जे कार्ड अपडेट होत नाहीत, अॅक्टिव्ह नसतात, त्यांची एक यादी पुरवठा विभागातर्फे तयार करण्यात आली. त्यानुसार, त्यांचे कार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच कार्ड असूनही धान्य न घेणाऱ्यांची माहिती काढली जाणार असून त्यांच्यावरही आगामी काळात कारवाई होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

कार्ड रद्द करण्याची कारणं काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील बोगस कार्ड आणि कार्डधारकांवरील नावे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एका कार्डवर साधारणतः चार जणांची नावं धरली तरी 56 हजार नागरिकांची नावं वगळण्यात आली आहेत. कार्ड अॅक्टिव्ह नसणे, चुकीची माहिती देणे, उत्पन्नाची माहिती चुकीची असणे यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळण्यात आली आहेत. अंत्योदय प्राधान्य कुटुंबाचे रेशनकार्ड असेल तर त्यांना सहा महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणे बंधनकारक आहे. परंतु कार्डधारकांनी रेशन घेतले नाही तर कार्ड रद्द होऊ शकते. अनेक कार्डधारकांनी उत्पन्नाची माहिती चुकीची दर्शवलेली असते. त्याचा जिल्ह्यातील ठोस आकडा अद्याप हाती आला नसला तरही अशा नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दारिद्र्य रेषेखाली किती लोक?

औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे 65 हजार रेशनकार्ड धारक असल्याचा अंदाज आहे. सुमारे तसाडे तीन लाख लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असून जनगणना झाल्यानंतर या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कुणाला किती मिळते स्वस्त धान्य?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो. प्रतिव्यक्ती तीन किलोप्रमाणे धान्य वाटप होते. साखर प्रति कुटुंब 20 रुपयांप्रमाणे वितरीत केली जाते.

इतर बातम्या-

Aurangabad | मेट्रो नकोय, अखंड उड्डाणपूल मंजूर करा, खासदार इम्तियाज जलील यांच्या लोकसभेत आणखी काय मागण्या?

Aurangabad | शहरातल्या नव्या जलवाहिनीच्या कामातील अडथळा दूर, MJP ने 5.80 कोटी भरले, आता तरी गती येणार का?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.