AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो.

Aurangabad | जिल्ह्यात 14 हजार रेशन कार्ड रद्द, काय आहेत कारणं? स्वस्त धान्य कुणाला किती मिळते?
| Updated on: Mar 24, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः मागील अनेक वर्षांपासून ज्या रेशन कार्डधारकांनी (Ration card) धान्य घेतलेले नाही. तसेच त्यांनी कुठेही नोंद अपडेट होत नाही, अशा खातेधारकांची नावे रद्द करण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad district) असे 14 हजार रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. देशभरात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र (Maharashtra) दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात कार्ड अॅक्टिव्ह न ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे जे कार्ड अपडेट होत नाहीत, अॅक्टिव्ह नसतात, त्यांची एक यादी पुरवठा विभागातर्फे तयार करण्यात आली. त्यानुसार, त्यांचे कार्ड रद्द करण्यात आले आहेत. तसेच कार्ड असूनही धान्य न घेणाऱ्यांची माहिती काढली जाणार असून त्यांच्यावरही आगामी काळात कारवाई होईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

कार्ड रद्द करण्याची कारणं काय?

औरंगाबाद जिल्ह्यातील बोगस कार्ड आणि कार्डधारकांवरील नावे रद्द करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एका कार्डवर साधारणतः चार जणांची नावं धरली तरी 56 हजार नागरिकांची नावं वगळण्यात आली आहेत. कार्ड अॅक्टिव्ह नसणे, चुकीची माहिती देणे, उत्पन्नाची माहिती चुकीची असणे यासारख्या कारणांमुळे ही नावं वगळण्यात आली आहेत. अंत्योदय प्राधान्य कुटुंबाचे रेशनकार्ड असेल तर त्यांना सहा महिन्यात स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेणे बंधनकारक आहे. परंतु कार्डधारकांनी रेशन घेतले नाही तर कार्ड रद्द होऊ शकते. अनेक कार्डधारकांनी उत्पन्नाची माहिती चुकीची दर्शवलेली असते. त्याचा जिल्ह्यातील ठोस आकडा अद्याप हाती आला नसला तरही अशा नागरिकांची माहिती संकलित केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दारिद्र्य रेषेखाली किती लोक?

औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे 65 हजार रेशनकार्ड धारक असल्याचा अंदाज आहे. सुमारे तसाडे तीन लाख लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असून जनगणना झाल्यानंतर या आकड्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कुणाला किती मिळते स्वस्त धान्य?

केशरी कार्डधारक कुटुंबांना 8 रुपये प्रति किलो गहू आणि 12 रुपये प्रति किलो तांदूळ या दरात धान्य दिले जाते. इतर लाभार्थ्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ वितरित केला जातो. प्रतिव्यक्ती तीन किलोप्रमाणे धान्य वाटप होते. साखर प्रति कुटुंब 20 रुपयांप्रमाणे वितरीत केली जाते.

इतर बातम्या-

Aurangabad | मेट्रो नकोय, अखंड उड्डाणपूल मंजूर करा, खासदार इम्तियाज जलील यांच्या लोकसभेत आणखी काय मागण्या?

Aurangabad | शहरातल्या नव्या जलवाहिनीच्या कामातील अडथळा दूर, MJP ने 5.80 कोटी भरले, आता तरी गती येणार का?

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.