AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | नाराज आमदारांना भाजपची खुली Offer, औरंगाबादेत Dr. Bhagwat Karad यांचं वक्तव्य!

तुम्हाला वाटतं भाजप विकास करतोय, तर तोच मुद्दा घेऊन मी सांगू शकतो की, महाविकास आघाडीतील नाराज आमदारांनी भाजप जॉइन करावा, असं वक्तव्य डॉ. भागवत कराड यांनी केलं.

Aurangabad | नाराज आमदारांना भाजपची खुली Offer, औरंगाबादेत Dr. Bhagwat Karad यांचं वक्तव्य!
डॉ. भागवत कराड यांची महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना ऑफर
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 12:46 PM
Share

औरंगाबाद| होळीनंतर महाराष्ट्रात जणू राजकीय धुळवड सुरु आहे. एकिकडे एमआयएमने (MIM) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसोबत निवडणूक लढवण्याची ऑफर दिली आहे तर भाजपनेही महाविकास आघाडीतील नाराज आमदारांना खुली ऑफर दिली आहे. महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी भाजपमध्ये सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केलं. औरंगाबादमध्ये त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना हे वक्तव्य केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे विकास खुंटला आहे. काही मंत्र्यांवर आरोपही आहेत. त्यामुळे बरेच आमदार नाराज असल्याचं मत डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केलं.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नाराज आमदार भाजपच्या वाटेवर आहेत, असं वक्तव्य करताना डॉ. भागवत कराड म्हणाले, ‘ महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडीमुळे विकास खुंटला आहे. काही मंत्र्यांवर थेट दाऊन इम्ब्राहिमशी संबंधित लोकांशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप आहेत. अशा स्थितीत भाजप कार्यकर्ता आणि केंद्रातला मंत्री म्हणून मी सांगतो, ज्यांना वाटतं, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, त्यांनी एकत्र जमलं पाहिजे. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं तर विकास होईल, असं मला नक्कीच वाटतं, असं वक्तव्य डॉ. कराड यांनी केलं.

नाराज आमदारांना माझं खुलं आव्हान…

डॉ. भागवत कराड पुढे बोलताना म्हणाले, ‘ परवा मी जालन्याच्या सभेत मी बोललो. जालन्याच्या काँग्रेसच्या आमदाराने विकासासाठी कमळही हातात घेण्याची तयारी दर्शवली. तेव्हाही मी म्हणालो की, तुम्हाला वाटतं भाजप विकास करतोय, तर तोच मुद्दा घेऊन मी सांगू शकतो की, त्या आमदारांना माझं खुलं आव्हान आहे.. त्यांनी जॉइन करावा, असं वक्तव्य डॉ. कराड यांनी केलं.

नाराज आमदारांबाबत रावसाहेब दानवें काय म्हणाले?

दरम्यान, महाविकास आघाडतील अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा काल जालन्यात भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब यांनी केला होता. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधले 25 आमदार बहिष्कार टाकणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढण्यात आली, असा गौप्यस्फोट दानवेंनी केला. तसेच आताच या आमदारांची नावं सांगितली तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असं वक्तव्यही त्यांनी केलं.

इतर बातम्या-

Mumbai top Pune : मुंबई ते पुणे प्रवास आणखी वेगवान होणार, शिवडी-न्हावाशेवा सी लिंक मुंबई-पुणे एक्सप्रेसला जोडणार

शिवसेना हिरवी सेना झालीय, Sena-MIMमध्ये काहीच फरक नाही; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.