AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाण पुलाचा प्रस्ताव पुढे सरकतोय, डॉ. कराड यांचे नितीन गडकरींना निवेदन

नागपूर-नाशिकच्या धर्तीवर औरंगाबाद शहरातही चिकलठाणा ते वाळूज दरम्यान अखंड पूल बांधण्याचा बहुचर्चित प्रस्ताव डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवला.

Aurangabad: औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाण पुलाचा प्रस्ताव पुढे सरकतोय, डॉ. कराड यांचे नितीन गडकरींना निवेदन
विकासकामांचा प्रस्ताव सादर करताना औरंगाबाद येथील शिष्टमंडळ
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 17, 2021 | 10:14 AM
Share

औरंगाबादः शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुचर्चित असा औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाणपुलाचा प्रस्ताव हळू हळू पुढे पडत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळलाने नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत औरंगाबाद शहरातील चिकलठाणा ते वाळूजपर्यंत अखंड पूल, नगर नाका-माळीवाडा ते वेरूळ या रस्त्याचे रुंदीकरण, औरंगाबाद-वैजापूर-शिर्डी मार्ग चौपदरीकरणाच्या मागण्यांचे निवेदन गडकरींना दिले.

.. तर शेंद्रा-वाळूज एमआयडीसी जोडली जाणार

चिकलठाणा ते वाळूज हा बहुचर्चित अखंड पुलाचा प्रस्ताव हळू हळू शासकीय फायलींद्वारे पुढे सरकतोय. मात्र तो प्रत्यक्षात अस्तित्वात आला तर शहरातील वाहतुकीची मोठी कोंडी दूर होईल. शहरातील मुख्य रस्ता असलेल्या जालना रोडवर चिकलठाणा ते वाळूजपर्यंत पूल झाला तर शेंद्रा आणि वाळूज या दोन औद्योगिक वसाहतींना थेट एकत्र जोडण्यात येईल. तसेच शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल, याकडे डॉ. भागवत कराड यांनी नितीन गडकरी यांचे लक्ष वेधले.

शहर विकासासाठी आणखी कोणत्या मागण्या

डॉ. भागवत कराड यांच्या नेतृत्वात औरंगाबाद येथील शिष्टमंडळाने इतरही रस्ते विकास कामांचे प्रस्ताव नितीन गडकरी यांच्यासमोर ठेवले. या शिष्टमंडळात वैजापूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, उद्योजक राम भोगले यांचा समावेश होता. त्यांनी पुढील विकासकामांचे निवेदन दिले.- नगरनाका- माळीवाडा-दौलताबाद टी पॉइंट ते थेट वेरूळपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. कारण सध्याचा रस्ता अरुंद असल्यामुळे इथे अपघातांची मालिकाच सुरु आहे. तसेच माळीवाड्यापर्यंत शहराचा विस्तार झाल्यामुळे तेथेही नागरिकांची वर्दळ असते. म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. औरंगाबाद-वैजापूर- शिर्डी या मार्गाचेदेखील चौपदीकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असल्याने तसेच शिर्डी देखील राष्ट्रीय पातळीवरचे धार्मिक स्थळ असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. त्यामुळे भाविकांना सध्याचा दुपदरी रस्ता कमी पडतो. या रस्त्याचेही रुंदीकरण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

इतर बातम्या-

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत

करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत सरकारचा मंत्री होता का?; आशिष शेलारांची शंका

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक