AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad MIM | नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ, इम्तियाज जलील औरंगाबादच्या पाणीप्रश्नी शिवसेना-भाजपावर भडकले

औरंगाबाद परिसरात प्रचंड पाणी असून फक्त वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे शिवसेना आणि भाजपने फक्त नामांतर आणि मंदिर-मशिदीचा मुद्दा उचलून धरल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला आहे.

Aurangabad MIM | नौटंकीने पाणी मिळणार असेल तर आम्हीही मोर्चात सहभागी होऊ, इम्तियाज जलील औरंगाबादच्या पाणीप्रश्नी शिवसेना-भाजपावर भडकले
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 23, 2022 | 1:36 PM
Share

औरंगाबादः शहराची पाणी पट्टी कमी करून आणि हंडा मोर्चासारखी नौटंकी करून औरंगाबादकरांना खरच पाणी मिळणार असेल तर मीसुद्धा मोर्चात सहभागी होईन, अशी संतप्त प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM Imtiaz Jaleel) यांनी दिली. शहरातील पाणी समस्येवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेविरोधात आज भाजपतर्फे विराट मोर्चा (BJP Morcha) काढला जात आहे. खुद्द देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) या मोर्चाचे नेतृत्व करणार आहे. शहरातील हजारो महिला रिकामे हंडे घेऊन या मोर्चात सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी चार वाजता हा मोर्चा पैठण गेट येथून निघून पालिका आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे. शिवसेनेने मागील २५-३० वर्षांपासूनच्या पाणी समस्येवर काहीही उपाय केला नाही, असा आरोप भाजपने केला आहे. तर शिवसेनेप्रमाणे भाजपदेखील सत्तेत होती, तेव्हा हा प्रश्न दिसला नाही, असा सवाल करत शिवसेना भाजपाला तोंडघाशी पाडण्याचा प्रयत्न करक आहे. त्यात आता एमआयएमनेही दोन्ही पक्षांना चांगलेच सुनावले आहे.

काय म्हणाले खा. जलील?

आज भाजप आणि फडणवीस साहेब नौटंकी करत आहेत. यामुळे जर पाणी मिळणार असेल तर मी काय औरंगाबादचे सगळेच लोक यात सहभागी होतील. पण अशी चीप पल्बिसिटी आम्हाला करायची नाही. हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही मोर्चाऐवजी जलजीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद पाणी वितरण, महापालिका पाणी वितरण अधिकारींची बैठक बोलवली असती. जी नवी पाणीपुरवठा योजना पुढील दोन वर्षात होणार आहे, ती सहा महिन्यात, एका वर्षात करता येईल का, यावर चर्चा झाली असती तर काही साध्य झालं असतं.

पाणी नाहीच ..हे रिकामा हंडा देणारेत…

भाजपच्या मोर्चावर प्रश्नचिन्ह उभं करताना एमयआयएमचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले, भाजपच्या मोर्चात सहभागी होणाऱ्या महिला पैसे देऊन आणल्या जाणार आहेत. तसेच त्यांना हंडेही घेऊन दिले जाणार असल्याचं सांगण्यात येत नाही. त्यामुळे पाणी नाही तर हंडा तरी मिळेल, या आशेने लोक मोर्चात सहभागी होत आहेत, असा आरोप खासदार जलील यांनी केला.

‘मंदिर-मशिदीच्या मुद्द्यामुळेच पाणी नाही’

औरंगाबाद परिसरात प्रचंड पाणी असून फक्त वितरणाची व्यवस्था नसल्यामुळे शिवसेना आणि भाजपने फक्त नामांतर आणि मंदिर-मशिदीचा मुद्दा उचलून धरल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवली आहे. या समस्येसाठी लोकही तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी हिंदु-मुस्लिमांचा मुद्दा उचलून धरणाऱ्यांना मतं दिलं. त्यांनी जर रस्ते आणि पाण्याचा प्रश्न उचलून धरला असता तर आज ही वेळ आली नसती. पाण्यासाठी लोकांनी कधीही मतदान केलं नाही.’

‘दोन पक्षांच्या श्रेयवादात जनता उपाशी’

खा. जलील म्हणाले, ‘ आज शहरातील दहा दिवसांनी एक तास पाणी पुरवठा होतो. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी औंरंगाबादमधून उकळली जाते. आत्ता ही पाणीपट्टी निम्मी कमी केली. त्याचे मोठे होर्डिंग्सही लावले आहेत. यासाठी भाजप-शिवसेना दोघंही जबाबदार आहेत. शिवसेना म्हणजे आमचा गड आहे तर भाजप म्हणते आमचा गड आहे. या दोघांच्या भांडणात औरंगाबादच्या जनतेला गाडण्याचं काम सुरु आहे, 30 वर्षांपासून शिवसेना औरंगाबादकरांना उल्लू बनवत आहे, असा आरोप खा. जलील यांनी केला.’

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?