AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर सुरू, तक्रार असल्यास बिनधास्त फोन करा, 24 तास उपलब्ध!

औरंगाबाद महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी नागरिक कॉल करू शकतात.

Aurangabad | औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर सुरू, तक्रार असल्यास बिनधास्त फोन करा, 24 तास उपलब्ध!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 05, 2022 | 9:31 AM
Share

औरंगाबादः स्मार्ट सिटीतर्फे औरंगाबाद (Smart Citi Aurangabad) महापालिकेसाठी हेल्पलाइन (Aurangabad helpline) नंबर सुरु करण्यात आला आहे. मनपा संबंधित कोणतेही प्रश्न विचारायचे असल्यास नागरिकांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांसाठी मदतीचा हात सदैव उपलब्ध असेल, असे आश्वासन महापालिकेतर्फे (Municipal Corporation) देण्यात आले आहे. सोमवारी ही सेवा लाँच करण्यात आली. हा उपक्रम स्मार्ट सिटीच्या इ गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

कोणत्याही वेळी फोन करू शकता…

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद स्मार्ट सिटीने नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा ई गव्हर्नन्स प्रकल्प हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पाद्वारे सेवेचा अधिकार अधिनियम अंतर्गत मनपा संबधित सर्व सेवा नागरिकांना जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम रित्या उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. नागरिकांना मनपा कडून पुरवल्या जाणाऱ्या सेवेंबद्दल काही प्रश्न असतील किंवा मदतीची गरज असेल तर नागरिक कुठल्याही वेळी 08069092200 या हेल्पलाईन वर संपर्क साधू शकतात. सोमवारी औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या हस्ते ही हेल्पलाईन लॉन्च करण्यात आली.

कोण-कोणत्या प्रश्नांचे निवारण?

या हेल्पलाईन वर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे संबधित प्रश्नांसाठी व मदतीसाठी नागरिक कॉल करू शकतात. एकदा कॉल केल्यावर मनपा प्रतीनिधी नागरिकांचे प्रश्न किंवा समस्येची ऑनलाइन नोंद करून घेतील आणि लगेच निवारण होत नसेल तर संबधित विभागाच्या कर्मचाऱ्याला यासाठी नेमण्यात येईल. स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी ही माहिती दिली. ठराविक वेळेवर निवारण झाले नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे ती समस्या जाईल. ह्या हेल्पलाईनचे संचालन स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथून करण्यात येईल.  यावेळी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपायुक्त संतोष टेंगळे, नगररचना विभाग प्रमुख ए. बी. देशमुख, उपायुक्त नंदा गायकवाड, उपायुक्त सोमनाथ जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा, स्मार्ट सिटीचे सेक्टर लीड एम. बी. काझी, प्रकल्प अभियंता फैज अली, प्रकल्प सहयोगी किरण आढे, माध्यम विश्लेषक अर्पिता शरद उपस्थित होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.