AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!

शहरातील विविध वसाहतींमधील कचरा वेळेत जमा व्हावा, असे योग्य नियोजन करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. तसेच बाजारपेठेतील कचराही दिवसातून दोन वेळेस उचलण्याच्या सूचना केल्या आहेत.

स्वच्छ दिवाळीसाठी औरंगाबाद मनपाचे सूक्ष्म नियोजन, कचऱ्याचा वेळीच बंदोबस्त करणार!
दिवाळीत घरोघरी कचरा साठणार नाही, यासाठी महापालिकेचे नियोजन
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 24, 2021 | 3:26 PM
Share

औरंगाबादः सणासुदीचे दिवस असल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर (Diwali festival) महापालिकेनेही काटेकोर नियोजन करायला सुरुवात केली आहे. दिवाळीच्या काळात शहरातील कचऱ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. शहरात विविध वसाहतींमध्ये, कचरा कुंड्यांवर कचरा साचून राहू नये, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pandey ) यांनी दिल्या आहेत.

अधिकारी वेळोवेळी पाहणी करणार

महापालिकेतील घनकचरा विभागाने विविध कॉलन्यांमध्ये कचरा साठू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतली आहे. खासगी कंपनीमार्फत जास्तीत जास्त कचरा उचलण्यात येईल, असे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही दिवाळीपर्यंत वेळोवेळी पाहणी करणार आहेत.

रेड्डी कंपनीला कंत्राट

महापालिकेने शहरातील कचरा संकलनाचे काम बंगळुरू येथील रेड्डी कंपनीला दिले आहे. एक मेट्रिक टन कचरा कंपनीने जमा करून प्रक्रिया केंद्रावर नेल्यास महापालिका 1680 रुपये देते. मागील काही दिवसांपासून कंपनीने दारोदार जाऊन कचरा गोळा करण्यावर भर दिला आहे. दिवळीच्या काळात अनेक नागरिक घराची रंगरंगोटी व सफाई करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर येतो. बाजारपेठेत व्यापारी सामान आणतात. सुका कचरा बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात निघतो. हा कचरा दोन वेळेस जमा करण्याच्या सूचना कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त सौरभ जोशी यांनी दिली.

वसाहतींचेही नियोजन करण्याच्या सूचना

शहरातील विविध वसाहतींमधील कचरा वेळेत जमा व्हावा, असे योग्य नियोजन करण्याचे कंत्राटदाराला सांगण्यात आले आहे. सध्या नागरिकांनी साफ-सफाई सुरु केली असून कचऱ्यात वाढ झाली आहे. पूर्वी 475 मेट्रिक टन कचरा जमत होता. आता मात्र हे प्रमाण 500 मेट्रिक टन पर्यंत पोहोचले आहे. दिवाळीपूर्वी 25 ते 30 मेट्रिक टन आणखी कचरा वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

115 वॉर्डांमध्ये कचरा संकलन, 320रिक्षा, 29 वाहने

शहरातील 115 वॉर्डांमधील कचरा संकलन रेड्डी कंपनीकडून करण्यात येत आहे. कंपनीकडे सध्या 320 रिक्षा आहेत. काही वॉर्डांची भौगोलिक रचना मोठी असल्याने तेथए दोन ते तीन रिक्षा देण्यात आल्या आहेत. रिक्षांमधून जमा होणारा कचरा प्रक्रिया केंद्रांवर नेण्यासाठी मोठी 29 वाहने आहेत. दिवाळीत या सर्व वाहनांची काम करण्याची गती वाढवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

इतर बातम्या-

तोंडोळी दरोडाः म्होरक्यासह एकाला बेड्या, 5 अद्याप फरार, आरोपींकडे मोबाइल नसल्याने लोकेशन शोधण्याचे आव्हान!

औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात योजनांची पुनर्बांधणी

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा