AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात योजनांची पुनर्बांधणी

जिल्ह्यातील 1245 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचा डीपीआर प्रशासनाने तयार केला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात 113 गावांना सौर मोटरपंपाद्वारे पाणीपुरवठा, 1245 गावात  योजनांची पुनर्बांधणी
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 22, 2021 | 5:08 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील (Aurangabad district) जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांनी पुनर्बांधणी केली जात आहे. याअंतर्गत 1 हजार 245 गावांत पाणीपुरवठा योजनांची आखणी होणार आहे. त्यातील 113 गावांमध्ये सोलार मोटरपंपांद्वारे (Solar motor pump) गावांना पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत या गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जलजीवन मिशन प्रकल्प संचालक सुदर्शन तुपे (Sudarshan Tupe) यांनी दिली.

पाणीपुरवठा योजनांचा आढावा

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नुकताच या योजनांच्या पुनर्बांधणीसाठी जिल्ह्यातील गावांमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. त्यापैकी 1245 गावांतील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामाचा डीपीआर प्रशासनाने तयार केला आहे.

कायमस्वरुपी जलस्रोतचा शोध आवश्यक

जिल्ह्यातील अनेक गावांत सार्वजनिक पाणीपुरवठा योजना असूनही उन्हाळ्यात गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी कोरड्या पडतात. यामुळे पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही. यावर उपाय म्हणून कायमस्वरुपी जलस्रोताचा शोध घेऊन योजना राबवा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिल्या.

113 गावांना सोलार पंपाद्वारे पाणीपुरवठा

दरम्यान, जिल्ह्यातील 113 गावांमध्ये वीज बिल थकल्यामुळे महावितरणणे शेकडो पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित केला. याचा फटका गावकऱ्यांना बसतो. वीजबिल भरणा केल्याशिवाय महावितरण जोडणी करीत नाही, म्हणून जिल्ह्यातील 113 गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजना सोलार पंपाद्वारे राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याअंतर्गत या गावांना सोलर पंपाचा पुरवठा केला जाणार आहे.

गावांचे अ,ब,क,ड गटात वर्गीकरण

जलजीवन मिशन अंतर्गत गावांचे अ,ब,क,ड असा गटांत विभाजन करण्यात आले आहे. सोलर पंप बसवण्याचे काम ड वर्गातील गावांत केले जाईल. तसेच क वर्गातील 409 गावांतील पाणीपुरवठा योजना खूप जुन्या झाल्या असून, मोडकळीस आल्या आहेत. या गावांत नव्याने पाणीपुरवठा योजना राबवाव्या लागतील अ वर्गातील 341 गावांतील पाणीपुरवठा योजनांतील विहिरीची खोली वाढवणे, वर्तुळाचा आकार वाढवणे, पंपिंग यंत्रणेची क्षमता वाढवणे आदी कामे केली जातील. ब वर्गवारीत असलेल्या 495 गावांतील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती केली जाईल.

इतर बातम्या-

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे सोलर पॅनल्स, इन्व्हर्टर आणि वीज महागणार

Toyota ची सूर्यकिरणांद्वारे चार्ज होणारी Electric Car सादर, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.