AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad VIDEO | नारेगावातल्या भंगार गोदामाला भीषण आग, भले मोठे धुराचे लोट, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

आजूबाजूच्या नागरिकांनी सदर घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीचा भडकाच एवढा मोठा होता की, संपूर्ण गोदाम या आगीत जळून खाक झाले.

Aurangabad VIDEO | नारेगावातल्या भंगार गोदामाला भीषण आग, भले मोठे धुराचे लोट, अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू
नारेगावातील गोदामाला भीषण आग Image Credit source: TV9 Marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 09, 2022 | 4:54 PM
Share

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील (Aurangabad city) नारेगाव परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग (Fire) लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. या उन्हामुळेच भंगाराच्या गोदामाला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. नारेगाव परिसरातील भंगाराच्या गोदामाला आज शनिवारी दुपारी ही आग लागली असून ती विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमक दलाचे (Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीचे स्वरुपच एवढे भीषण आहे की पाहणाऱ्यालाही धडकी भरत आहे.

लांबच लांब धुराचे लोट

औरंगाबाद शहरात भंगार गोदामाला भीषण आग लागल्याचे दृश्य एवढे भयंकर होते की, परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. दुपारी चार वाजेच्या सुमारास ही आग लागली. भंगाराच्या गोदामातून काळ्या धुराचे मोठ-मोठे लोट निघत होते. आजूबाजूच्या नागरिकांनी सदर घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीचा भडकाच एवढा मोठा होता की, संपूर्ण गोदाम या आगीत जळून खाक झाले.

औरंगाबादचा पारा 41 अंशांवर

नारेगावातील गोदामाला लागलेल्या आगीचे कारण वाढलेला उष्मांक असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून औरंगाबादच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी तर औरंगाबादमधील या मौसमातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले. येथील कमाल तापमान 41.1 अंश सेल्सियस एवढे होते. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक बाहेर न पडता घरातच राहणे पसंत करत आहेत. दुपारी बारा वाजेपासूनच रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

इतर बातम्या-

Anand Paranjpe: तर आम्हीही दुप्पट चोप देऊ शकतो; आनंद परांजपे यांचा मनसेला इशारा

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेअंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी ! इच्छुकांनी आपला अर्ज ‘या’ पत्त्यावर पाठवावा, ८ मे शेवटची तारीख

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली