AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्यांचे राजकारण हा दंगली घडवण्याचा डाव, RPI पाठोपाठ राष्ट्रवादीचाही आक्षेप,

राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी सभा घेण्याचे घोषित केले आहे. औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे.

Raj Thackeray | राज ठाकरेंची औरंगाबाद सभा, भोंग्यांचे राजकारण हा दंगली घडवण्याचा डाव, RPI पाठोपाठ राष्ट्रवादीचाही आक्षेप,
मनसे अध्यक्ष राज ठाकरेImage Credit source: tv9
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 18, 2022 | 12:33 PM
Share

औरंगाबाद | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुढची प्रचंड मोठी सभा औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली आहे. येत्या 1 मे रोजी ही सभा घेतली जाईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पुण्यात केली. विशेष म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Banasaheb Thackeray) यांची गाजलेली सभा ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर घेण्यात आली होती, तेथेच राज ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली आहे.  या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मनसेचे पदाधिकारी कामालाही लागले आहेत. मात्र मशीदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून (Hanuman Chalisa) राजकारण करून शहरात दंगली घडवण्याचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपची सुपारी घेऊन असे काम करत असल्याचा आरोपही औरंगाबाद राष्ट्रवादीने केला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षातर्फे औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी राज्य सरकारला करण्यात आली आहे. त्यात राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंच्या धोरणांवर आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रवादीचे पदाधिकारी काय म्हणाले?

राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी सरचिटणीस मुश्ताक अहमद म्हणाले, राज ठाकरे यांचा पक्ष संपला असून त्यांना आत फारसे काम नाही. भारताच्या स्वातंत्र्यापासून सर्व समाज एकत्र राहत आहेत, राज ठाकरे यांचे वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे. तर औरंगाबादचे शहराध्यक्ष ख्वाजा शरीफउद्दीन म्हणाले, राज ठाकरे यांना कोणतेही धोरण नाही. दोन समाजात दंगल घडवण्याचा प्रयत्न करायचा आणि महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. संपूर्ण भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

RPI- खरात गटाची मागणी काय?

राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबादमध्ये परवानगी देऊ नये, अशी मागणी आरपीआयचे सचिन खरात यांनी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व धर्म समभाव मानणारे आहे. राज ठाकरे वारंवार सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तवे करत आहे. आता राज ठाकरे हे औरंगाबाद येथे सभा घेणार आहेत परंतु औरंगाबाद क्रांतीभूमी आणि नामांतर भूमी आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणि गुण्यागोविंदयाने राहतात त्यामुळे धर्माच्या नावाखाली राजकारण करणाऱ्या राज ठाकरेंना औरंगाबाद मधील सभेला परवानगी देऊ नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राज्य सरकारला करत आहे.

सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा

राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातल्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर एक मे रोजी सभा घेण्याचे घोषित केले आहे. औरंगाबाद शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयारीला लागली आहे. लवकरच यासंदर्भातील परवानग्या मिळवल्या जातील असे शहराध्य सुमित खांबेकर यांनी सांगितले. परवानगी मिळाली नाही तरी राज ठाकरे यांची सभा घेतली जाईलच, असा इशाराही मनसेने दिला आहे.  सांस्कृतिक मंडळाच्या याच मैदानावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सभाही प्रचंड गाजलेल्या आहेत. आता राज ठाकरेंनीही त्याच ठिकाणी विराट सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे असेल.

इतर बातम्या-

Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश

Pune : पीएमपीएमएलतर्फे आज ‘बस डे’चं आयोजन, 250 ज्यादा बसेस धावणार, महिलांना मोफत प्रवास

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार