Aurangabad School | औरंगाबाद ग्रामीण भागात आजपासून सर्व वर्ग सुरु, शहरातील शाळांसाठी काय निर्णय?

महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा हद्दीतील शाळांचे आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय मात्र आणखी आठवडाभराने घेतला जाईल.

Aurangabad School | औरंगाबाद ग्रामीण भागात आजपासून सर्व वर्ग सुरु, शहरातील शाळांसाठी काय निर्णय?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:33 AM

औरंगाबादः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर (Corona Third Wave) ओसरू लागल्यामुळे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातील (Aurangabad district school) पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या प्राथमिक शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरु होतील, असा निर्णय काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Nilesh Gatne) यांनी जाहीर केला. मात्र शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी कोरोनाचे नियम पाळण्यासंबंधीच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 24 जानेवारी रोजी ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता आठवडाभरातच पहिली ती सातवीचे वर्गही सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातील सर्व वर्ग ऑफलाइन पद्धतीने सुरु होत आहेत. शिक्षकांचीही 100 टक्के उपस्थिती आणि पूर्ण वेळ शाळा सुरु होणार असून आगामी परीक्षांच्या तयारीकरिता विद्यार्थ्यांना काहीसा वेळ मिळेल.

शाळा सुरु, पण उपस्थिती आहे का?

मागील आठवड्यात ग्रामीण भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. मात्र सुरुवातीला विद्यार्थ्यांची अत्यंत कमी उपस्थिती होती. हळू हळू सोमवारनंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा आहे. सध्या सराव परीक्षा, प्रात्यक्षिक, सर्व विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे मुख्याध्यापकांचे म्हणणे आहे. आता पहिली ते सातवीचे वर्गही सुरु झाल्यानंतर आठ ते दहा दिवसात हळू हळू विद्यार्थी संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शहरातील शाळांसाठी काय निर्णय?

शहरातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय एक आठवड्यानंतर घेण्यात येईल, असे मनपाचे शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग कमी होतोय. हे प्रमाण आणखी कमी झाल्यानंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. सोमवारी शहरात फक्त 212 रुग्ण आढळले. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी मनपा हद्दीतील शाळांचे आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणीही सुरु झाली आहे. इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय मात्र आणखी आठवडाभराने घेतला जाईल.

इतर बातम्या-

स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार, पोलिसांची छापेमारी, दोन तरुणींसह चौघे रंगेहाथ सापडले

Rani Chatterjee No Makeup : अभिनेत्री राणी चॅटर्जी फिट राहण्यासाठी घेत आहे खास मेहनत, पाहा फोटो!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.