AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील नामवंत लेखक आणि भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांचे निधन, साहित्य विश्वात हळहळ

डॉ. जेवळीकर हे मराठीतील ख्यातकीर्त लेखक होते. ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

मराठवाड्यातील नामवंत लेखक आणि भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांचे निधन, साहित्य विश्वात हळहळ
प्रसिद्ध लेखक व भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर यांचे निधन
| Updated on: Feb 28, 2022 | 4:06 PM
Share

औरंगाबादः मराठवाड्यातील नामवंत लेखक आणि प्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. सुहास जेवळीकर (Dr. Suhas Jewalikar) यांचे नुकतेच निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. ज्येष्ठ साहित्यिक आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Government Mediacal Collage) भूलतज्ज्ञ विभागाचे ते प्रमुख होते. शविवारी रात्री उशीरा दीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधीक्षक म्हणूनही त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते. अनेक काव्यमैफली, विद्रोही साहित्य संमेलनं आणि साहित्यिक (Marathi Literature) कार्यक्रमांमध्ये जेवळीकर यांनी आपली अनोखी छाप सोडली होती. समाजातील अनेक विसंगतींवर नेमकेपणाने बोट ठेवत मार्मिक भाष्य करण्याची त्यांची शैली होती. त्यांनी लिलिहेल्या कविता आणि वर्तमानपत्रांतील स्तंभांतून त्यांचे लिखाण प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या निधनानंतर साहित्यविश्वातील एक दिलदार माणूस हरवला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

अत्यंत साध्या पद्धतीने निरोप

अत्यंत साधी विचारसरणी असलेल्या डॉ. जेवळीकर यांनी नेहमीच साध्या विचारांचं सोनं लुटलं. त्यामुळे रविवारी त्यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कारही याच पद्धतीने करण्यात आले. ना हारतुऱ्यांच्या माळा, ना कोणता विधी, अगदी साधेपणाने त्यांना निरोप देण्यात आला. डॉ. सुहास यांनी नेहमीच आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले. हे करताना त्यांनी कधीही समाजाचे दडपण घेतले नाही. त्यामुळे त्यांना निरोप देताना कोणताही विधी होणार नाही, अशी भूमिका डॉ. जेवळीकर यांच्या पत्नी संध्या यांनी घेतली.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

डॉ. जेवळीकर हे मराठीतील ख्यातकीर्त लेखक होते. ऐरणीच्या देवा, सभोवार, स्वास्थसंवाद, तिरीप, दहशतीची दैनंदिनी (कवितासंग्रह) ही त्यांची काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा वाड्मयीन पुरस्कार, आपटे वाचन मंदिर, इचलकरंजीच्या वतीने दिला जाणारा इंदिरा संत पुरस्कार आदी सन्मानांनी गौरवण्यात आलेलं आहे.

मान्यवरांच्या उपस्थितीत निरोप

डॉ. सुहास जेवळीकर यांच्या निरोप समारंभासाठी प्रा. डॉ. जयदेव डोळे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, मंगल खिवंसरा, सुधीर महाजन, डॉ. सुहास रोपळेकर, डॉ. नीता पाडळकर, डॉ. मनीषा भोंडवे, डॉ. जयश्री सोनवणे, डॉ. अविनाश येळीकर, डॉ. अर्चना राणे, डॉ. मेघा जोगदंड, कौतिकराव ठाले पाटील, प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

इतर बातम्या-

सोनालीच्या ‘शुद्ध मराठी’ Tweetआधी लेखक अरविंद जगताप महत्त्वाचं बोललेत! नेमकं ते काय होतं?

गरज पडली तर तुमचं धोतर फेडू, राज्यपाल महोदय माफी मागा! मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांचा इशारा

पश्चिम विदर्भात यंदाही पाणी टंचाईची शक्यता, धरणात उरलंय फक्त एवढंच पाणी…

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.