AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 9:11 AM
Share

औरंगाबादः उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पाणी प्रश्न (Water Supply Problem) गंभीर बनला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांनी (AMC Administrator) आता पाणीपुरवठ्यातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपायुक्तांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यावर होती. हा विभाग आता उपायुक्त संतोष टेंगळे (Santosh Tengle) यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. शहरातील अनेक भागात कुठे चार तर कुठे सात किंवा नऊ दिवसांनी पाणीपुरवठा सुरु होता. उन्हाळा सुरु झाल्यापासून तर पुरवठा प्रचंड विस्कळीत झाला आहे. आता उपायुक्त या प्रश्नावर कसे मार्ग काढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलकांचे लक्ष मनपाच्या नियोजनाकडे

उन्हाळा सुरु होताच अनेक भागात अघोषित लोडशेडिंगदेखील सुरु झाले. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा दिवस असूनही वीजपुरवठ्याअभावी पाणी मिळाले नाही. सिडको-हाडकोसह अनेक भागात सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 15 कलमी कार्यक्रमही घोषित केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला स्वतंत्र उपायुक्त नेमला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता उपायुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त यातून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार दिवसाआड पाणी देण्याचे उद्दिष्ट

शहरातील जुनी पाणीपुरवठा वाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत अससल्यामुळे वारंवार पाणीपुरवठ्यात अडथळे येतात. त्यात कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी वीजपुरवठा करणाऱ्या पॅनलमध्ये बिघाड होतो. पाइपलाइन फुटल्यानेही पाणीपुरवठा विस्कळीत होतो. ही संकटांची मालिका थांबली तरच शहराला नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यानंतर शहरात सर्वत्र एकसमान सूत्राप्रमाणे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.