AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

Aurangabad | शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपातर्फे उपायुक्तांची नियुक्ती, आता तरी प्रश्न सुटणार का?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 27, 2022 | 9:11 AM
Share

औरंगाबादः उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरातील पाणी प्रश्न (Water Supply Problem) गंभीर बनला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासकांनी (AMC Administrator) आता पाणीपुरवठ्यातील समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपायुक्तांची नियुक्ती केली आहे. आतापर्यंत या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंत्यावर होती. हा विभाग आता उपायुक्त संतोष टेंगळे (Santosh Tengle) यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. शहरातील अनेक भागात कुठे चार तर कुठे सात किंवा नऊ दिवसांनी पाणीपुरवठा सुरु होता. उन्हाळा सुरु झाल्यापासून तर पुरवठा प्रचंड विस्कळीत झाला आहे. आता उपायुक्त या प्रश्नावर कसे मार्ग काढतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलकांचे लक्ष मनपाच्या नियोजनाकडे

उन्हाळा सुरु होताच अनेक भागात अघोषित लोडशेडिंगदेखील सुरु झाले. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाण्याचा दिवस असूनही वीजपुरवठ्याअभावी पाणी मिळाले नाही. सिडको-हाडकोसह अनेक भागात सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर मनपा आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी 15 कलमी कार्यक्रमही घोषित केला. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाला स्वतंत्र उपायुक्त नेमला जाईल, असे सांगण्यात आले होते. आता उपायुक्तांवर जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त यातून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार दिवसाआड पाणी देण्याचे उद्दिष्ट

शहरातील जुनी पाणीपुरवठा वाहिनी अत्यंत जीर्ण अवस्थेत अससल्यामुळे वारंवार पाणीपुरवठ्यात अडथळे येतात. त्यात कधी वीजपुरवठा खंडित होतो तर कधी वीजपुरवठा करणाऱ्या पॅनलमध्ये बिघाड होतो. पाइपलाइन फुटल्यानेही पाणीपुरवठा विस्कळीत होतो. ही संकटांची मालिका थांबली तरच शहराला नियोजनानुसार पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यानंतर शहरात सर्वत्र एकसमान सूत्राप्रमाणे चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शहरातील पाणीपुरवठ्याची आढावा बैठक घेतली. यात संतोष टेंगळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. यासंदर्भात टेंगळे यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात असून नागरिकांना समान चार दिवसाआड पाणी देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन सुरु आहे.

Follow Us
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक