AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदांच्या प्रारुप आराखड्याची तपासणी, गट, गण वाढीवर चर्चांना उधाण!

औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी एक गट वाढेल. तसेच कन्नड किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात पंचायत समितीचे दोन गण असतात. त्यामुळे ज्या तालुक्यात गट वाढतील, तिथे गणांची संख्याही वाढेल.

ZP Elections| औरंगाबाद जिल्हा परिषदांच्या प्रारुप आराखड्याची तपासणी, गट, गण वाढीवर चर्चांना उधाण!
औरंगाबाद जिल्हा परिषद
| Updated on: Feb 09, 2022 | 3:00 AM
Share

औरंगाबादः जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या (Aurangabad ZP Election) पार्श्वभूमीवर गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या फेररचनेचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra Election Commission) केलेल्या सूचनेनुसार, वाढील लोकसंख्या लक्षात घेता औरंगाबाद जिल्हा परिषदेचे 8 गट आणि पंचायत समितीचे 16 गण वाढणार आहेत. राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या आणि 284 पंचायत समित्यांच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयारी सुरु आहे. या निवडणुकांसाठी तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्याची तपासणी सध्या राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु झाली आहे. 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान ही तपासणी होईल.

12 फेब्रुवारी रोजी औरंगाबादची तपासणी

राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या प्रारुप प्रभाग आराखड्याच्या तपासणीचा वार आणि तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार, औरंगाबाद जिल्ह्याचा आराखडा 12 फेब्रुवारी तपासण्यात येईल. हा आराखडा पाठवताना कोणत्या बाबींचा विचार केला गेला, त्यासाठी आधार घेतलेली कागदपत्रे, नकाशे आदीही सोबत आणण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

गट आणि गणांत बदल कसे ?

औरंगाबादेत विद्यमान जिल्हा परिषदेत 62 गट तर पंचायत समित्यांचे एकूण 124 गण आहेत. राज्य शासनाच्या सदस्यसंख्या वाढीच्या निर्णयाला राज्यपालांनीही मंजुरी दिली आहे. गट आणि गणांची रचना करताना 10 टक्के वाढीव लोकसंख्या विचारात घेतली जाईल. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत 8 गण व पंचायत समित्यांचे 16 गण वाढतील. निवडणुकीपूर्वी गटांची संख्या 70 आणि गणांची संख्या 136 होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

कोणत्या तालुक्यात किती गण वाढणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद, सिल्लोड तालुक्यात प्रत्येकी 2 तर फुलंब्री, पैठण, वैजापूरमध्ये प्रत्येकी एक गट वाढेल. तसेच कन्नड किंवा खुलताबाद तालुक्यात एक गट वाढेल. जिल्हा परिषदेच्या एका गटात पंचायत समितीचे दोन गण असतात. त्यामुळे ज्या तालुक्यात गट वाढतील, तिथे गणांची संख्याही वाढेल. नव्या गट रचनेमुळे गावांची संख्या कमी होईल. पूर्वी एका गटात 23 ते 25 गावांचा समावेश होता. आता गटाच्या रचनेनंतर एका गटातील गावांची संख्या 21 ते 23 पर्यंत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इतर बातम्या-

‘अंगावर आलात तर शिंगावर घेऊ’, नाना पटोलेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याला आशिष शेलारांचं जोरदार प्रत्युत्तर

Nashik | महापालिकेच्या अर्थसंकल्पात नाशिककरांना काय मिळाला मोठा दिलासा; कोणत्या योजनांसाठी किती कोटी?

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.