AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्च महिन्यात ऑफलाइन परीक्षा, औरंगाबाद विभागात दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित

विभागीय मंडळाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित झाली आहेत. राज्य मंडळाचे अद्याप कोरोनासंबंधी नवे निर्देश न आल्यामुळे ऑफलाइन परीक्षेची तयारी बोर्डाकडून केली जात आहे.

मार्च महिन्यात ऑफलाइन परीक्षा, औरंगाबाद विभागात दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित
students
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 7:00 AM
Share

औरंगाबादः माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. बोर्डाकडून याकरिता तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी विभागीय मंडळाअंतर्गत औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित झाली आहेत. राज्य मंडळाचे अद्याप कोरोनासंबंधी नवे निर्देश न आल्यामुळे ऑफलाइन परीक्षेची तयारी बोर्डाकडून केली जात आहे.

दहावी, बारावीचे किती विद्यार्थी?

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून 1 लाख 79 हजार 486, तर बारावी परीक्षेसाठी 1 लाख 64 हजार 333 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 ते 12 हजारांनी जास्त आहे. सध्या प्राथमिक पातळीवर केलेल्या नियोजनानासुर औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दहावीसाठी 629, तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मात्र प्रसंगानुरुप विद्यार्थी संख्येनुसार, केंद्रात वाढ होऊ शकते, असे विभागीय मंडळाचे सचिव आर पी पाटील म्हणाले.

परीक्षेच्या तारखा काय?

दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होईल. तर प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी सुधार परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च रोजी होईल. तर बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी आणि श्रेणी सुधार परीक्षा ही 14 फेब्रुवारी ते 3 मार्च आणि लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे.

इतर बातम्या-

Video : कडाक्याच्या थंडीतही भारतीय जवानांचं शौर्य पाहून अभिमानानं फुलेल तुमची छाती

Natural Farming: देशभरात 43 लाखांहून अधिक शेतकरी करतात सेंद्रिय शेती, ‘हे’ राज्य आहे आघाडीवर

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.