AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होणार, अनुदानाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करणार

अजूनही 6 लाख 66 हजार 900 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पुढील दोन दिवसात उर्वरीत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात होणार, अनुदानाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करणार
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 01, 2021 | 10:50 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे (Damege to crops) मोठे नुकसान झाले. असंख्य शेतकऱ्यांची खरीप पिके वाहून गेली. यासाठी राज्य सरकारकडून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial compensation) जाहीर झाली असून औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) याचे वितरणही सुरु झाले आहे. शुक्रवारपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणे सुरु झाले आहे. मागील दोन दिवसात 37 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 कोटी 53 लाख 49 हजार 462 रुपये जमा झाले आहेत. अजूनही 6 लाख 66 हजार 900 शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र पुढील दोन दिवसात उर्वरीत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील, अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 7 लाखांहून अधिका शेतकऱ्यांचे नुकसान

औरंगाबाद जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान 7 लाख 4 हजार 280 शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या 524655.71 हेक्टरांवरील खरीपाच्या पिकांना नुकसान झाले. तसेच शेकडो एकर शेती पाण्यासोबत खरवडून निघाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही हातातून गेला आहे. अशा शेतकऱ्यांना एकाच वर्षात दुहेरी नुकसान भोगावे लागत आहे. शासनाने पीक नुकसानीचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वाटप करावे, असे जाहीर केले होते. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

6 तालुक्यांतील शेतकऱ्यांना अद्याप अनुदान नाही

जिल्ह्यातील दोन दिवसात 37 हजार 358 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 25 कोटी 53 लाख 49 हजार 462 रुपये जमा झाले आहेत. मात्र जिल्ह्यातील 9 पैकी वैजापूर, सिल्लोड आणि सोयगाव या तीन तालुक्यांतच पीक नुकसानीचे अनुदान वाटप सुरु झाले आहके. तर सहा तालुक्यांतील 7 तहसील कार्यालयांमध्ये अद्याप अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरुच झालेली नाही. यात अप्पर औरंगाबाद तहसील, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर, पैठण, फुलंब्री, सिल्लोड आणि खुलताबाद या तहसील कार्यालयांचा समावेश आहे.

इतर बातम्या

बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या देण्याचे अमिष, औरंगाबादेत 150 महिलांची फसवणूक, दीड लाख उकळले, चौघांविरुद्ध गुन्हा

एमआयएमच्या ऑडिओ क्लिपने औरंगाबादेत खळबळ, पक्षात फूट पडल्याचे संभाषण

Follow Us
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...
दिमागी नक्षलवाद: सोशल मीडियावर नवीन ट्रेंड, लाखोंनी केले फॉलो
दिमागी नक्षल पार्टीचा सोशल मीडियावर धुमाकूळ: पंतप्रधानांच्या शब्दातून झालेली ऑनलाईन चळवळ
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना दिले तातडीचे निर्देश... झारखंड विद्यार्थी आंदोलनावर अखेर राहुल गांधींनी सोडलं मौन
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत...
दिल्लीत राजकीय हालचालींना वेग! CM फडणवीस आणि पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल;
मोठी बातमी! मनोज जरांगेंचे वडील त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात दाखल; लेकाची प्रकृती खालावल्याचं कळताच...
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता