AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!

अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू, असे वक्तव्य केले होते. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी अब्दुल सत्तारांना खरमरीत उत्तर दिलं आहे.

सत्तार उद्या शिवसेनेत राहण्याचीच खात्री नाही, दानवेंना नांगरावर पाठवणारा कुणीही नाही, डॉ. भागवत कराड यांची खरमरीत टीका!
भाजप नेते डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते अब्दुल सत्तार
| Edited By: | Updated on: Jan 22, 2022 | 1:04 PM
Share

औरंगाबादः सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना घवघवीत यश मिळालं. भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. मात्र यात दानवेंना हार पत्करावी लागली. सोयगाव येथील विजयी मिरवणुकीनंतर अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवेंना लवकरच नांगर हाकण्यास पाठवू, असे वक्तव्य केले होते. ही टीका भाजपच्या जिव्हारी लागली असून भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी अब्दुल सत्तारांना खरमरीत उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्तार यांच्या टीकेला उत्तर देताना tv9 च्या प्रतिनिधींकडे प्रतिक्रिया नोंदवली. ते म्हणाले, अब्दुल सत्तार आज जे बोलतात ते उद्या विसरून जातात. रावसाहेब दानवे यांना वखरावर पाठवणारा लोकसभा मतदार संघात कुणीही नाही. अब्दुल स्ततार हे सत्तेच्या मागे धावणारे नेते आहेत. आगामी निवडणुकीत ते शिवसेनेबरोबर राहतीलच याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांचं बोलणं आम्ही फार मनावर घेत नाहीत, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी दिली.

सोयगावात सत्तारांनी भगवा फडकवला

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव नगरपंचायतमधील एकूण 17 पैकी 11 जागांवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. तर भाजपला 6 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी प्रतिक्रिया देताना, सत्तार म्हणाले होते, रावसाहेब दानवे यांच्यासह दोन केंद्रीय राज्यमंत्री माझ्याविरोधात होते. मात्र त्यांना आम्ही भुईसपाट केले आहे. तसेच मागील लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव करेपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असे सत्तार म्हणाले होते. सोयगावमधील विजयानंतर ही डोक्यावरील टोपी निघेल, असा विश्वास देतो, अशी विजयी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

इतर बातम्या-

VIDEO: शेलार म्हणाले, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जरी वाचले तरी… ; राऊतांनी ऐकवला मराठा साम्राज्याच मूलमंत्र!

Mauni Amavasya| 2022 या वर्षाची सोमवती अमावस्या कधी ? तीचे महत्त्व काय? जाणून घ्या

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.