AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Marathwada Rain | मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, हजारो जनावरे पुरात गेली वाहून…

यंदाच्या या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पुरामुळे शेतातील मातीही वाहून गेल्याच्या घटना पुढे आल्या. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने चांगली आलेली पिके जळून गेलीत. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे.

Marathwada Rain | मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू, हजारो जनावरे पुरात गेली वाहून...
| Edited By: | Updated on: Aug 21, 2022 | 10:33 AM
Share

मुंबई : यंदा राज्यात दमदार पावसाने (Rain) हजेरी लावलीयं. यामुळे जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झाली असून अनेक नद्यांना पूर आल्याच्या घटना देखील घडल्या. दरवेळीपेक्षा यंदा चांगला पाऊस राज्यात झालायं. पुढील काही दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या पावसाळ्यामध्ये आतापर्यंत मराठवाड्यातील तब्बल 52 जणांचा मृत्यू (Death) झालायं. इतकेच नाही तर सततच्या पावसामुळे शेतींचे आणि पिकांचे देखील मोठे नुकसान (Damage) झाले. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाहीयं.

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू

मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आकडा पुढे आलायं. यावर्षीच्या पावसात हजारो जनावरे पुरात वाहून गेली तर वीज पडूनही अनेक जनावरांचा मृत्यू झालायं. निसर्गाच्या या रुद्र रूपाने यंदाच्या पावसाळ्यात जून ते 19 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने 52 व्यक्ती दगावल्याची माहित दिलीयं. तसेच पुढील काही दिवस देखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

लाखो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान शेतकरी राजा हवालदिल

यंदाच्या या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पुरामुळे शेतातील मातीही वाहून गेल्याच्या घटना पुढे आल्या. शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने चांगली आलेली पिके जळून गेलीत. शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची गरज आहे. मात्र, शेतकऱ्यांपर्यत अद्यापही कोणतीही मदत पोहचली नाहीयं. शासनकर्ते फक्त मोठ्या घोषणा करतात मदत नाही, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.