AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करू; मुंबई पोलिसांना आले 26 मेसेज; विरारमधून एकाला ताब्यात

मुंबईः मुंबईवर 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी सशस्त्र सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच शुक्रवारी रात्री मुंबई […]

मुंबईवर 26/11 पेक्षाही मोठा हल्ला करू; मुंबई पोलिसांना आले 26 मेसेज; विरारमधून एकाला ताब्यात
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 21, 2022 | 8:08 AM
Share

मुंबईः मुंबईवर 26/11 सारखा हल्ला (26/11 Attack) करुन मुंबई शहर उडवून देण्यारे मेसेज मुंबई पोलिसांना आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. असे 26 मेसेज पोलिसांना आले असले तरी मुंबई पोलिसांनीही खबरदारीचा इशारा म्हणून सुरक्षेत प्रचंड वाढ करून या मेसेज प्रकरणाचा कसून तपास सुरु करण्यात आला आहे. हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी सशस्त्र सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागात मुबारक हो मुंबई में हमला होने वाला है, असे धमकीचे 26 मेसेज (26 message Mumbai Police) मुंबई पोलिसांना आले आहेत. मुंबईला उडवण्याची तयारी सुरू आहे 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याकरिता काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत असल्याचे मेसेजमध्ये म्हटले आहे. ज्या नंबरवरून हे मेसेज आले आहेत तो नंबर पाकिस्तानचा असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणी विरारच्या भाटपाडामधू मोहम्मद असेच या 22 वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून हा मेसेज कुठून आणि कसा आला त्याचीही इतर यंत्रणामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानातून मेसेज

राज्यासह मुंबईत शुक्रवारी गोपाळकाला सर्वत्र जल्लोषात साजरा होत असतानाच रात्री पावणे अकराच्या दरम्यान वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातील एका व्हाट्सअप नंबरवर धमकीचे 26 मेसेज आणि दोन स्क्रीनशॉट आले होते. मेसेज करणाऱ्याने तो पाकिस्तानी असल्याचे सांगत मुंबईवर 26/11 सारखा किंवा त्यापेक्षा मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देण्यात आली. त्यासाठी आम्ही तयार असून काही हिंदुस्तानी लोक माझ्यासोबत आहेत शिवाय अजमल कसाब हलवाई यासारख्या कुख्यात दहशतवाद्यांच्या नावांचा उल्लेखदेखील मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

बरोबर हिंदुस्थानातील 6 जण

धमकीच्या मेसेज बरोबर हिंदुस्थानातील सहा जणांचे नंबरदेखील पाठवण्यात आले आहेत. माझे लोकेशन इकडेच दाखवले पण काम मुंबईत चालेल असा मेसेजही पाठवण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक विभागाकडून लगेच याबाबत मुंबई पोलीस एटीएसच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सांगण्यात आल्यानंतर धमकीच्या संदेशावरून अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान कलम 506/2 अन्वेय वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबईत महत्वाच्या ठिकाणी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.

मोबाईल पाकिस्तानातील लाहोरमधील

मोबाईल नंबर पाकिस्तानच्या लाहोर येथील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा असल्याचे समजले आहे. मोहम्मद हा येथील शिक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे कामाला आहे त्याचा मोबाईल चोरीला तर गेलाच आहे, पण तो अँड्रॉइड फोन नाही त्यामुळे त्या नंबर वरून व्हाट्सअप मेसेज आलाच कसा असंही त्याचे म्हणणे आहे.

पोलीस कार उडवून देण्याचा कट

पंजाब पोलीस दलातील उपनिरीक्षकाच्या गाडीखाली आयडी ठेवून ती उडवून देण्याचा कट असणारा मुख्य सूत्रधार दहशतवादी राजेंद्र कुमार उर्फ भाऊ रामकुमार विधिला शिर्डीतून अटक करण्यात आली अहमदनगर पोलीस आणि नाशिक एटीएस पथकाने हे संयुक्त कारवाई केल्याची माहिती शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी दिली आहे. दहशतवादी राजेंद्र कुमार याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयाने ट्रांजिट रिमांड मंजूर केल्याने त्याला अमृतसर पोलीस आयुक्तालयाचे स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान राजेंद्र कुमार शिर्डीत कुठे कुठे राहिला आणि त्याच्या साथीदार होते का याचा तपास पोलीस करीत आहेत

मुंबईकरांनी काळजी करू नये

या दहशतवादी मेसेजेसची आणि गंभीरपणे दखल घेण्यात आली असून मुंबईकरांनी काळजी करू नये निर्धास्त राहावे असे सांगण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिले आहे ज्या नंबर वरून हे मेसेज आले तो नंबर पाकिस्तानचा कोड असल्याचे फणसाळकर यांनी सांगितले आहे.

अन्य तपास यंत्रणाही सतर्क

या मोबाईल नंबरचा शोध घेतला जाणार असून या तपासासाठी एटीएस बरोबरच अन्य तपास यंत्रणाही संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईच्या सागरी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून मुंबईचे सागरी कवच अधिक सक्षम करण्यासाठी तटरक्षक दलाच्या समन्वयाने काम सुरू असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. हा मेसेज आला असला तरी मुंबईतील सुरक्षेत कोणतीही कसूर सोडण्यात आली नसून नागरिकांनी निर्धास्त राहावे असंही सांगण्यात आले आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?