AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत भारत-बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, आजपासून रंगणार तीन वनडे सामन्यांची मालिका

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी बीडच्या ज्योतिराम घुलेला मिळाली आहे. संघाच्या उपकर्णधारपदी दीपक जावळे यांची निवड झाली. भारतीय संघात या दोघांसह राजू चव्हाण, मनोज धोत्रे, जमीर पठाण हे पाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहेत .

औरंगाबादेत भारत-बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन, आजपासून रंगणार तीन वनडे सामन्यांची मालिका
आजपासून भारत-बांग्लादेश तीन दिवसीय वन डे दिव्यांग क्रिकेट स्पर्धा
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 26, 2021 | 12:28 PM
Share

औरंगाबादः  शहरात आजपासून तीन दिवस भारत-बांग्लादेश (India-Bangladesh ODI) दरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी साडे नऊ वाजता औरंगाबाद महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik Kumar Pamdey)  यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील एमजीएमच्या मैदानावर आज भारत-बांग्लादेश या देशांदरम्यान दिव्यांग क्रिकेट स्पर्धेला (Cricket tournament) सुरुवात होत आहे. या दोन्ही संघात तीन वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. आज मंगळवारी सलामीचा सामना एमजीएमच्या मैदानावर होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व बीडचा गुणवंत खेळाडू ज्योतिराम घुले (Jyotiram Ghule) हा करतोय. तर बांग्लादेशच्या संघाचे नेतृत्व सायमॉनकडे आहे. या क्रिकेट स्पर्धेसाठी बांग्लादेशचा दिव्यांग क्रिकेट संघ सोमवारी औरंगाबादमध्ये दाखल झाला आहे. बांग्लादेश संघ या दौऱ्यात भारताविरुद्ध वन डे, कसोटी आणि टी-20 सामने खेळणार आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व ज्योतिराम घुले याच्याकडे

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी बीडच्या ज्योतिराम घुलेला मिळाली आहे. खेळातील कारकीर्दीच्या पदार्पणातच ज्योतिराम घुलेला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे पदार्पणातच टीमला मालिका विजय मिळवून देणार, असा निश्चय केल्याची माहिती त्याने पत्रकार परिषदेत दिली. भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी दीपक जावळे यांची निवड झाली. भारतीय संघात या दोघांसह राजू चव्हाण, मनोज धोत्रे, जमीर पठाण हे पाच महाराष्ट्रीयन खेळाडू आहे . सामन्यांच्या सुरुवातीला भारतीय संघाने बॅटिंग घेतली असून 20 ओव्हरमध्ये भारतीय संघाने 127 धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या.

मनपा प्रशासकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते झाले. तसेच एमजीएमचे डीन प्रवीण सूर्यवंशी, एँडर्स अँड हाऊजर्स कंपनीचे मॅनेजर श्रीराम नारायणन हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विजय पांगरेकर, सिडको पोलीस स्टेशनचे एपीआय संभाजी पवार, स्मार्ट सिटी बसचे प्रोजेक्ट मॅनेजर आदित्य तिवारी, एँडर्स अँड हाऊजर्स कंपनीचे संदीप तुळापूरकर तसेच बोर्ड ऑफ डिसेबल्ड क्रिकेट असोसिएशनचे अली सर यांची विशेष उपस्थिती होती. या क्रिकेट सामन्यांचे आयोजकत्व महाराष्ट्र दिव्यांग क्रिकेट संघाचे संजय चव्हाण यांच्याकडे आहे.

29 ऑक्टोबरला अंतिम सामना

या वन डे मालिकेसाठी बांग्लादेश दिव्यांग क्रिकेट पटूंची टीम सोमवारीच औरंगाबादेत दाखल झाली आहे. बांग्लादेशाच्या चमूत एकूण 24 जण असून त्यांची व्यवस्था हर्सूल परिसरातील क्लीक हॉटेल येथे करण्यात आली आहे. 29 ऑक्टोबर रोजी या मालिकेतील अंतिम सामना असून 30 ऑक्टोबरला बांग्लादेश क्रिकेटची टीम औरंगाबादहून रवाना होईल.

इतर बातम्या-

Weather: ऐन हिवाळ्यात ढगांचे मळभ का? तळपता सूर्य पुन्हा का गायब झाला? वाचा मराठवाड्यातला हवामानाचा अंदाज

औरंगाबादः कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला, नव्या वर्षात 10 समित्यांच्या निवडणुका

Follow Us
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?