AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर अर्धा तास बोलले, मनोज जरांगे यांचा फक्त दोनच शब्दात इशारा; काय म्हणाले जरांगे?

नोंदी मिळाल्याबाबतची स्पष्टता सरकारकडून आली पाहिजे. सरकारशी याबाबत बोलणं झालं आहे. समाजामध्ये संभ्रम नाही आणि समाज फ्रेश आहे. आमच्यामध्ये संभ्रम नाही. आता बीडला मराठे एकवाटणार आहेत. भाकरी बांधून समाज एकवटणार आहे. पुढून एखादा शब्द आला तर आम्ही हुरळून जाणार नाहीत. सर्व शंका दूर झाल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आंदोलन सुरूच राहणार आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणावर अर्धा तास बोलले, मनोज जरांगे यांचा फक्त दोनच शब्दात इशारा; काय म्हणाले जरांगे?
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 20, 2023 | 3:02 PM
Share

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जालना | 20 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत अर्धा तासाहून अधिक वेळ मराठा आरक्षणावर भाष्य केलं. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याचीही घोषणा केली. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनावर मनोज जरांगे पाटील समाधानी नाहीयेत. मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 23 तारखेच्या आत आरक्षणाची घोषणा करा, अशी मागणी केली आहे. सरकारने घोषणा केली नाही तर 24 तारखेनंतर सरकारला जड जाईल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दोनच वाक्यात जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुख्यमंत्री यांनी काल अधिवेशनात भूमिका मांडली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना साथ दिली. त्याबद्दल मराठा समाजाने कौतुक केले आहे. परंतु जी स्पष्टता हवी होती, ती दिसली नाही. त्यामधील जे दोन शब्द राहिले आहेत. ते पण ते घेतो म्हणाले. त्यामुळे काही विषय राहिलेला नाही. 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला 100 टक्के न्याय मिळेल की नाही याची स्पष्टता मुख्यमंत्र्यांना करावी लागणार आहे. त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. एव्हढे मोठे आरक्षण दिले आणि यात खुटी ठेवली तर त्या आरक्षणाचा फायदा होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षण टिकणारं आहे काय?

मुख्यमंत्र्यांच्यावतीने रात्री फोन आला होता. जे विषय राहिले त्याबाबत स्पष्टता करू असं आश्वासन देण्यात आलं आहे. फेब्रुवारीत अधिवेशन होणार आहे. पण तो विषय क्युरेटिव्ह पीटिशन संदर्भातील आहे. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्याशिवाय क्युरेटिव्ह पीटिशन सुनावणीला घेतेलं नाही. फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन मराठा समाजाला जे आरक्षण दिले जाणार आहे ते NT, VJNT सारखे टिकणारे आहे का?, असा सवाल जरांगे यांनी केला.

तर जड जाईल

फक्त आरक्षण देऊन चालणार नाही, याबाबत उद्या बोलणार असे सांगण्यात आले. सरकारने 23 तारखेच्या आत आरक्षण द्यावं. नाही तर 24 तारखेनंतर सरकारला जड जाईल. 24 तारखेपूर्वी मराठा समाजाला न्याय मिळेल अशी आशा आहे, असा इशाराच त्यांनी दिला.

पाचर कशाला ठेवली?

रक्ताच्या सोयऱ्यांना आरक्षण देणार का? आई ओबीसी असेल तर मुलाची जातही ओबीसी लावायला दिली पाहिजे. त्याबाबत सरकारचं काय म्हणणं आहे? रक्ताच्या सोयऱ्यांना आरक्षणात आणण्यासाठीच्या काय अटी आहेत? या सर्व गोष्टी सरकारने सांगितल्या पाहिजे. तुम्ही धाडसी निर्णय घेतला. मग पाचार कशाला ठेवली? असा सवाल त्यांनी केला.

स्पष्टीकरण द्या

उद्या शासन निर्णय काढणार असेल तर अटी आणि शर्ती घालू नका. सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पण दरवाजाला कडीच नाही. आम्हाला जे शब्द दिले होते त्यातील दोन शब्द राहिलेत. 24 तारखे नंतर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे आम्हाला वाटते. परंतु स्पष्टीकरण दिले पाहिजे. स्पष्टीकरण करणार नसाल तर एवढी मोठी घोषणा करून काही उपयोग नाही. उद्या शिष्टमंडळ येणार की नाही याची माहिती अधिकृत माझ्याकडे नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हत्ती गेला, शेपूट राहिले…

आरक्षण दिले आहे. परंतु त्या दरवाज्याला कडीच लावली नाही. हत्ती गेला आणि शेपूट राहिले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यावर मी बोलणार नाही.जयंत पाटील विशेष अधिवेशना संदर्भात बोलले असेल. त्याबद्दल बोलणार नाही. परंतु विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज नाही. शासकीय नोंदी सापडल्या आहेत. त्या नोंदीनुसार आरक्षण जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ.

मोठी बातमी! शिंदेंचा ऑपरेशन टायगरचा प्लॅन फसला? थेट 6 जणांना…, राजकारणात मोठी खळबळ

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण...

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा.

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार.

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार