AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange-Patil : तर माझीच अंत्ययात्रा निघेल… मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गर्भित इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर घणाघाती हल्ला केला आहे. आम्हाला दहा दिवसात आरक्षण द्या. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एकतर विजय यात्रा निघेल नाही तर...

Manoj Jarange-Patil : तर माझीच अंत्ययात्रा निघेल... मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला गर्भित इशारा
manoj jarange patilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2023 | 12:30 PM
Share

जालना | 14 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला सज्जड इशारा दिला आहे. आम्ही 24 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहणार आहे. 22 ऑक्टोबर रोजी आम्ही पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. आता आम्ही माघार घेणार नाही. आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण घेतल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. यापुढे मी टोकाचं उपोषण करेल. आता एक तर आरक्षण मिळाल्याची विजय यात्रा निघेल किंवा माझीच अंत्ययात्रा निघेल, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

अंतरवली सराटी येथे आज मराठा समाजाची मोठी सभा पार पडली. या सभेला हजारोंची गर्दी उसळली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार भाषण केलं. मला मरण आलं तरी चालेल पण मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

तर जबाबदारी सरकारचीच

24 ऑक्टोबरला आरक्षण दिलं नाही तर 22 ऑक्टोबरला काय करायचं ते सर्वांना सांगितलं जाईल. आंदोलन शांततेत होईल. शांततेच आरक्षण मिळणार हा शब्द आहे. काळजी करू नका. 22 ऑक्टोबरला ला पुढची दिशा ठरवली जाईल. आरक्षण नाही दिलं तर पुढची जबाबदारी सरकारची असेल. पुन्हा तेच सांगतो. आरक्षण दिलं नाही तर पुढची जबाबदारी सरकारचीच असेल. मराठ्यांची नाही. 22 ऑक्टोबरला पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

टोकाचं उपोषण करू

आंदोलन शांततेत करायचं. आरक्षण कसं देत नाही ते मराठे पाहतील. अमरण उपोषण करून एक तर माझी अंत्ययात्रा निघेल. नाही तर विजय यात्रा निघेल. आता माघार नाही. 24 ऑक्टोबरच्या आत आरक्षण हवंच. नाही तर टोकाचं उपोषण करू, असा इशाराच त्यांनी दिला.

समित्यांचा घाट बंद करा

राज्य सरकारने आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन केली आहे. ही समिती पुरावे गोळा करत आहे. समितीला 5 हजार पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता सरकारने समित्यांचा घाट बंद केला पाहिजे. येत्या दहा दिवसात आरक्षण दिलं पाहिजे. तसं आपलं ठरलं होतं. त्यानुसार आता निर्णय घ्या, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं.

Follow Us
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?