AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी; आ. प्रशांत बंब आक्रमक, वीज वितरण कार्यालयावर काढणार मोर्चा

शेतकऱ्यांचा खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे. ते आपल्या मागणीसाठी येत्या गुरुवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहेत.

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी; आ. प्रशांत बंब आक्रमक, वीज वितरण कार्यालयावर काढणार मोर्चा
प्रशांत बंब
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 6:34 AM
Share

औरंगाबाद :  ज्या शेतकऱ्यांनी थकीत वीजबिल भरले नाही, अशा शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सध्या महावितरणकडून सुरू आहे. मात्र महावितरणच्या अशा धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. पिकांना ऐन पाणी देण्याचा हंगाम आणि वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शेताला पाणी कसे द्यायचे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. पाण्याविना पिके सुकून जात असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आता याविरोधात आमदार प्रशांत बंब हे रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ते वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर  येत्या गुरुवारी मोर्चा काढणार आहेत.

मोर्चात हजारो शेतकरी सहभागी होणार

महावितरण थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करत आहे. काही ठिकाणी तर थेट डीपीच बंद करण्यात आली आहे. यामुळे जे शेतकरी नियमित वीजबिल भरत आहेत त्यांना देखील आपल्या पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याभावी पिके जळून चालली आहेत. आता या विरोधात गंगापूरचे आमदार प्रशांत बंब हे आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. ते आपल्या मगणीसाठी येत्या गुरुवारी वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यातील हजारो शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शेतकरी हातबल

दरम्यान महावितरणच्या मनमानी कारभाराचा फटका सध्या शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. महावितरणने वीजबिल भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे. जे शेतकरी वीजबिल भरणार नाही अशांचा विद्युतपुरवठा खंडित केला जात आहे. विद्युतपुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. याचा सर्वाधिक फटका हा गहू आणि उसासारख्या पिकांना बसला आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तर रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये महावितरणचे थकीत बिल कसे भरावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

संबंधित बातम्या 

Jalgaon : निधन झालेल्या वडिलांचा पुतळा तयार करून घेतले सात फेरे, जळगावातल्या अनोख्या लग्नाची गोष्ट

Mumbai : नारायण राणेंच्या इंग्रजीवरून सेना-भाजपमध्ये जोरदार सामना, शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

सुना है, मेरे घर आज-कल मे सरकारी मेहमान आने वाले है; नवाब मलिकांच्या ट्विटने तर्कवितर्कांना उधाण

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.