AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी, आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटकांना रेल्वे मार्गाने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल असे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

Aurangabad | औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी, आमदार सतीश चव्हाण यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना औरंगाबाद-अहमदनगर-पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पासंदर्भात निवेदन देताना आ.सतीश चव्हाण. सोबत आ.विक्रम काळे, मा.आ.संजय खोडके...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 26, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः  औरंगाबाद-अहमदनगर-पुणे (Aurangabad-Nagar-Pune) हा अतिशय महत्वाचा असलेला प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग (Railway) प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे शिफारस करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण आज विधान भवन, मुंबई येथे अजित पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठवाड्यात विविध रेल्वे प्रकल्पांच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र यातील अनेक रेल्वे प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा अतिशय महत्वाचा असलेला प्रस्तावित नवीन रेल्वे मार्ग करण्यासाठी मध्यंतरी खूप प्रयत्न सुरू होते. या नवीन रेल्वे मार्गासाठी रेल्वेच्या अधिकार्‍यांनी भेट देऊन या मार्गाच्या उपयुक्ततेबाबत चाचपणी केली. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचेच सर्वेक्षण करण्यात आले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबाद-नगर-पुणे रेल्वेमार्ग का महत्त्वाचा?

औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे प्रकल्प पूर्ण झाल्यास औद्योगिकदृष्ट्या महत्वपूर्ण ठरणार आहे. या मार्गामुळे वाळूज, रांजणगाव, शेंद्रा, सुपा, चाकण या औद्योगिक वसाहतींना मोठा फायदा होणार आहे. तसेच यामुळे ‘आयटी हब’ पुणे व औरंगाबाद येथील ‘ऑरिक सिटी’ला थेट ‘कनेक्टिव्हिटी’ मिळण्याच्या दृष्टीने मदत होणार असून या माध्यमातून मराठवाड्यातील तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे सतीश चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची ओळख झाली आहे. जगप्रसिध्द अजिंठा, वेरूळ लेणी पाहण्यासाठी देश-विदेशातून दरवर्षी हजारो पर्यटक याठिकाणी भेटी देतात. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद-अहमदनगर-पुणे हा रेल्वे मार्ग झाल्यास पर्यटकांना रेल्वे मार्गाने प्रवास करणे अधिक सोयीचे होईल असे देखील आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद

आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांना आश्वस्त केले. यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार संजय खोडके यांची देखील उपस्थिती होती.

इतर बातम्या-

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

Buldana Market | महागाई आणि चारा टंचाईमुळे जनावरे विक्रीस, खामगाव बाजारात कवडीमोल भाव

Follow Us
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली
लाडकी बहिण योजने बाबत सर्वात मोठी अपडेट! अपात्र बहिणींकडून होणार वसूली.
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा
जवळच्या व्यक्तीनेच केला खरातचा गेम! फार्महाऊसवरील नको ते व्हिडीओ गोळा.
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि
रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक, 'राजा शिवाजी'चि.
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री..
भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का, खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? राजका.
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी
वाल्मिक कराडला जेलमध्ये टीव्ही, व्हीआयपी ट्रीटमेंट अन्... कैद्याची नवी.
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार
विदर्भात उष्णतेची लाट कायम; अकोल्यात 45°C, नागपुरात पारा 44°C पार.
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटः 'प्रबुद्ध भारत'च्या संपादकांचा खळबळजनक दावा.