AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगबााद महापालिका सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवर मोबाइल टॉवर उभारणार, ठराव मंजूर

शहरात लवकरच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे महसूल तर वाढेलच, शिवाय नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

औरंगबााद महापालिका सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवर मोबाइल टॉवर उभारणार, ठराव मंजूर
प्रातिनिधिक छायाचित्र
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 20, 2022 | 5:17 PM
Share

औरंगाबादः शहरातील अनधिकृत मोबाइल टॉवरचे (Mobile tower) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खासगी मालमत्तांवर अत्यंत धोकादायक पद्धतीने हे टॉवर उभारले जात आहेत. संबंधित मोबाइल कंपन्यांकडून महापालिकेला जास्तीचा महसूल मिळत नाही. त्यामुळे शहरात (Aurangabad city) महापालिकेच्या आणि सोसायट्यांच्या मोकळ्या जागांवरही आता टॉवर उभारले जातील, असा निर्णय महापालिकेने (Aurangabad municipal corporation) घेतला आहे. या संदर्भातला ठराव नुकताच प्रशासनाने मंजुर केला आहे. मार्च 2021 मध्ये मोबाइल टॉवरची कर वसुली खासगी एजन्सीमार्फत करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. कोरोना संसर्गामुळे या ठरावाची अंमलबजावणी करता आली नाही. यासंदर्भात लवकरच पुढील प्रक्रिया राबवण्याचा मानस प्रशासनाचा राहणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

काय आहे नेमकी समस्या?

शहरात 600 पेक्षा जास्त मोबाइल टॉवर आहेत. यातील 299 टॉवर अनधिकृत उभारले असल्यामुळे महापालिकेने त्यांना दुप्पट कर लावला आहे. संबंधित कंपन्या दुप्पट कर लावल्याने मनपाला एक रुपयाचाही महसूल देत नाहीत. अनेक वर्षांपासून मोबाइल कंपन्या आणि मनपा प्रशासन यांच्यात वाद सुरु आहे. टॉवर सील केल्यानंतर मोबाइल सेवा ठप्प पडते. नागरिकांकडून ओरड सुरु होते. त्यामुळे महापालिका प्रातिनिधीक स्वरुपातच कारवाई करते. तसेच मोबाइल कंपन्या ज्या खासगी मालमत्तांवर टॉवर उभारतात, त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसते. टॉवर कोसळला तर आसपासच्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात एक धोरणात्मक निर्णय घेतला. मोबाइल कंपन्यांना टॉवर उभारण्यासाठी म हापालिका आपल्या मालकीच्या खुल्या जागा उपलब्ध करून देईल. त्याप्रमाणे विविध सोसायच्यांच्या जागा मनपाकडे हस्तांतरीत केलेल्या आहेत. त्यातील 10 टक्के जागेवर टॉवर उभारण्याची मुभा राहील, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

लवकरच पुढील प्रक्रिया राबवणार- अपर्णा थेटे

मार्च 2021 मध्ये मोबाइल टॉवरची कर वसुली खासगी एजन्सीमार्फत करण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. कोरोना संसर्गामुळे या ठरावाची अंमलबजावणी करता आली नाही. यासंदर्भात लवकरच पुढील प्रक्रिया राबवण्याचा मानस प्रशासनाचा राहणार आहे, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले. शहरात लवकरच महापालिकेच्या मालकीच्या जागांवर मोबाइल टॉवर उभारण्याची परवानगी दिली जाईल. यामुळे महसूल तर वाढेलच, शिवाय नागरिकांच्या जीवाला धोका राहणार नाही, असे महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले.

इतर बातम्या-

Ravindra Chavan : विकासकामांवरुन आमदार रविंद्र चव्हाण यांची खासदार श्रीकांत शिंदेंवर टीका

लव्ह बर्ड्स रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी ताज महाल भेटीला! पाह खास फोटो

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.