AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अजब फंडा, औरंगाबादेत थ्री फेज खंडित, सिंगल फेजने पुरवठा, शेतकरी अडचणीत

कृषी पंपांसाठी असलेल्या थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करुन सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सिंगल फेजवर कृषीपंप सुरु होत नसल्याने पिके तसेच गाळपासाठी आलेल्या उसाने नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अजब फंडा, औरंगाबादेत थ्री फेज खंडित, सिंगल फेजने पुरवठा, शेतकरी अडचणीत
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 2:08 PM
Share

औरंगाबादः वाळूज परिसरातील कृषीपंपधारक शेतकरी ग्राहकांकडून वीज बिल वसुलीसाठी महावितरणने अजब वसुली फंडा वापरला आहे. या ग्राहकांकडे जवळपास 23 कोटी रुपये थकीत आहेत. ही थकीत रक्कम वसुलीकरिता महावितरण थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करून सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. सिंगल फेजवर कृषीपंप चालत नसल्याने ऊस पिकांना पाणी कसे द्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

2 हजार शेतकऱ्यांची जोडणी, थकबाकीचा आकडा वाढलेलाच

वाळूज सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या वाळूज, शिवराई, नारायणपूर, नायगाव, बकवाल नगर, जोगेश्वरी, घाणेगाव आदी गावांतील जवळपास 2 हजार शेतकऱ्यांनी महावितरणकडून कृषीपंपासाठी वीज जोडणी घेतली आहे. बहुतांश कृषीपंपधारक शेतकरी बिलाचा भरणा करीत नसल्यामुळे थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. कृषीपंपधारक ग्राहकांना महावितरणकडून सूचना देऊन तसेच जनजागृती करून 3 एचपीचा वापर असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी किमान 5 हाजर, 5 एचपीसाठी 7 हजार 500 रुपये, 7.5 एचपीसाठी 10 हजार रुपये व 10 एचपीसाठी किमान 15 हजार रुपयांचा भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

थ्री फेजऐवजी सिंगल फेजने पुरवठा सुरु

वाळूज परिसरातील 1922 कृषीपंपधारक वीज ग्राहकांकडे 23 कोटी 26 लाखांची थकबाकी असल्याचे सहाय्यक अभियंता प्रणित खंडागळे यांनी सांगितले. बिलाचा भरणा करण्यास शेतकरी उदासीन असल्याने महावितरणकडून शुक्रवारपासून कृषी पंपांसाठी असलेल्या थ्री फेजचा वीजपुरवठा बंद करुन सिंगल फेजचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. सिंगल फेजवर कृषीपंप सुरु होत नसल्याने पिके तसेच गाळपासाठी आलेल्या उसाने नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

इतर बातम्या- 

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र, कलानी परिवाराच्या हाती सत्तेचा रिमोट कंट्रोल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.