AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!

जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 10:41 AM
Share

औरंदगाबादः जिल्ह्यातील लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी नागरिकांना लसीकरणाची आणखी सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

15 डिसेंबरनंतर धडक मोहीम!!

ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण केले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून या करावाईला सुरुवात होणार आहे.

आणखी कठोर नियम कोणते?

– जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी लसीचे डोस घेतले आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. – तसेच लसीचा डोस न घेतलेल्या शिक्षकांना आठवड्याला कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. – लसीकरणासाठी जिल्ह्यात मोबाइल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार आहे. – लसीकरण न झालेल्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. – विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरायचा असल्यास, तत्पूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे की नाही, याची खात्री करावी. – लसीकरण मोहिमेत बेफिकीरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तत्काळ कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत, देसाई म्हणतात मनसे म्हणजे गळकं घर!

Omicron : डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉनची काय स्थिती? काय म्हटलं मुंबई महापालिकेनं? वाचा

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.