AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!

जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्का वाढण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी आणखी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र असूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

Aurangabad Vaccination: पात्र असूनही लस न घेतलेल्यांना 15 दिवसाला 500 रुपये दंड, 15 डिसेंबरपासून धडक मोहीम!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Dec 10, 2021 | 10:41 AM
Share

औरंदगाबादः जिल्ह्यातील लसीकरणाचे (Corona Vaccination) उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी नागरिकांना लसीकरणाची आणखी सक्ती केली आहे. ज्या लोकांनी अद्याप दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी 15 डिसेंबरपर्यंत दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पात्र असूनही लस घेण्यास दिरंगाई करताना आढळल्यास अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

15 डिसेंबरनंतर धडक मोहीम!!

ज्या नागरिकांनी पहिला डोस घेऊन 85 दिवस पूर्ण केले आहेत. मात्र दुसरा डोस घेणे बाकी आहे, अशा नागरिकांना दर 15 दिवसांनी 500 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून या करावाईला सुरुवात होणार आहे.

आणखी कठोर नियम कोणते?

– जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आणखी सक्तीचे आदेश दिले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महाविद्यालय, कोचिंग क्लासेसमधील ज्या शिक्षकांनी लसीचे डोस घेतले आहेत, त्या शिक्षकांनी महिन्यातून एकदा कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. – तसेच लसीचा डोस न घेतलेल्या शिक्षकांना आठवड्याला कोरोना चाचणी करणे बंधनकारक असेल. – लसीकरणासाठी जिल्ह्यात मोबाइल व्हॅन पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, हे पथक मागणीप्रमाणे घरोघरी जाऊन नागरिकांचे लसीकरण करणार आहे. – लसीकरण न झालेल्या प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. – विद्यार्थ्यांना परीक्षा किंवा स्कॉलरशिपसाठी अर्ज भरायचा असल्यास, तत्पूर्वी त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे की नाही, याची खात्री करावी. – लसीकरण मोहिमेत बेफिकीरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर विभागप्रमुखांनी तत्काळ कारवाई करावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

इतर बातम्या-

राज ठाकरेंच्या दौऱ्याआधीच औरंगाबाद मनसेत भूकंप! पदाधिकारी शिवसेनेत, देसाई म्हणतात मनसे म्हणजे गळकं घर!

Omicron : डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉनची काय स्थिती? काय म्हटलं मुंबई महापालिकेनं? वाचा

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.