AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार

बालरोग तज्ज्ञांचे अनेक वर्षांपासून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एक विमा कंपनी त्यासाठी तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची गरज असल्याचे इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनच्या अध्यक्षांनी सांगितले.

जन्मजात दोष असलेल्या बालकांवरील शस्त्रक्रियांना कवच मिळण्याचे प्रयत्न, बाल शल्यचिकित्सा परिषदेत विचार
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 2:55 PM
Share

औरंगाबादः मूल जन्मतःच आढळून येणाऱ्या बालकातील अनियमितता अथवा विकृतीवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतो, मात्र अशा शस्त्रक्रियांचा खर्च सर्वसामान्य नागरिकांना परवडणारा नसतो. जन्मल्यावर अशा समस्या उद्भवू शकतात हे अनेकदा मूल गर्भातच असताना कळलेले असते. पण पुढचा खर्च झेपवणार म्हणून अनेक दाम्पत्य गर्भपाताचा निर्णय घेतात. अशा बालकांना आणि पर्यायाने शस्त्रक्रियांना विम्याचे कवच मिळावे, यासाठी भारतीय विमा नियमन आणि विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून गती देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले.

इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनतर्फे आयोजित 47 व्या आयएपीएसकॉन-2021 या व्हर्चुअल राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. भागवत कराड बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु आणि ज्येष्ठ पेडियाट्रिक सर्जन डॉ. स्नेहलता देशमुख यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती होती.

विमा कंपनीची कवच देण्याची तयारी

इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जनचे अध्यक्ष डॉ. रवींद्र रामदवार यांनी लहान बाळांच्या अशा शस्त्रक्रियांना कवच मिळण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न केले आहे. पेडियाट्रिक संघटनेनेही ही मागणी अनेक वर्षांपासून उचलून धरली होती. आता या प्रयत्नांना यश आले असून एक विमा कंपनी त्यासाठी तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र या प्रक्रियेला आणखी वेग येण्याची गरज असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. या परिषदेला संघटनेचे सचिव डॉ. रवी कनोजिया, सहसचिव डॉ. अमर शाह, डॉ. मंजूषा सेलूकर यांचीही उपस्थिती होती.

औरंगाबादेत आयुष रुग्णालयाची मागणी

औरंगाबाद शहरात आयुष रुग्णालयाची स्थापना व्हावी, यासाठी अनेक जण आग्रही आहेत. या मागणीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनवाल यांची भेट घेतली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या धर्तीवर औरंगाबादेत आयुष रुग्णालयाची स्थापना करण्याची मागणी केली. यावेळी नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचे अध्यक्ष वेंद्य जयंत देवपुजारी, आयुर्वेद व्यासपीठाचे वैद्य संतोष नेवपूरकर, उद्योजक राम भोगले उपस्थित होते.

इतर बातम्या-

येणार म्हणता म्हणता आलेच नाहीत, दरवर्षी नियोजन सांभाळणारे मंत्री कराड नेमके कुठे राहिले?

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.