AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिक्षणाचा असा अवमान? वरिष्ठ पदं रिक्त असूनही शिपाई पदावर उच्चशिक्षित! औरंगाबाद ZP मध्ये चाललंय काय?

जिल्हा परिषदेने क वर्गाची शेकडो पदे रिक्त असताना अनुकंपा तत्त्वावर भरती करताना उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता त्यांची सरसकट शिपाई पदावर निवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिक्षणाचा असा अवमान? वरिष्ठ पदं रिक्त असूनही शिपाई पदावर उच्चशिक्षित! औरंगाबाद ZP मध्ये चाललंय काय?
औरंगाबाद जिल्हा परिषद
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 07, 2022 | 12:01 PM
Share

औरंगाबादः जिल्हा परिषदेने क वर्गाची शेकडो पदे रिक्त असताना अनुकंपा तत्त्वावर भरती करताना उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता त्यांची सरसकट शिपाई पदावर निवड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पदांसाठी बीई, बीएससी, एमएससी, बीएस, बीएड, बी कॉम उत्तीर्ण झालेल्यांची वर्णी जिल्हा परिषदेनं लावली आहे. शैक्षणिक अर्हता पाहता त्यांना वरिष्ठ पदे देता आली असती, मात्र त्यांच्या शिक्षणाचा अवमान करण्यात आला, असा आरोप करण्यात येत आहे. दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित वृत्तात याविषयी माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

औरंगबााद जिल्हा परिषदेने नुकतीच शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया पार पाडली. राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेअंतर्गत शासकीय अधिकारी, कर्चमाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील एकका व्यक्तीला त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग क अथवा ड पदावर अनुकंपा तत्त्वावर तत्काळ सेवेत घेण्याची तरतूद आहे. संबंधित कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर पाच वर्षात यासाठीचा अर्ज करावा लागतो. अशा सुमारे 180 जणांची प्रतीक्षा यादी औरंगाबाद जिल्हा परिषदेकडे आहे. एकूण रिक्त पदाच्या दहा टक्के पदे अनुकंपाधारकातून भरण्याचे अधिकार प्रशासनाला आहेत. ही प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली. अनुकंपाधारक उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांची वर्ग क किंवा वर्ग ड पदावर निवड करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने मात्र अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक पात्रतेचा विचार न करता सरसकट परिचर पदावर निवड केली. ही निवड याती जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर 5 जानेवरी रोजी प्रकाशित करण्यात आली. यात 15 जण बीई, एमएससी आदी उच्चशिक्षित आहेत.

तातडीने सुधारणा यादी जाहीर करण्याची मागणी

जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार क किंवा ड वर्गातील पदांवर निवड करण्याचा शासनाचा आणि औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय आहे. प्रशासनाने ही भरती प्रक्रिया राबवताना उच्चशिक्षित उमेदवारांची निवड शिपाई पदावर करून त्यांच्या शिक्षणाचा अवमान केलाय. त्यामुळे तातडीने सुधारीत यादी जाहीर करावी, अशी मागणी समाजकल्याण सभापती मोनाली राठोड यांनी केली आहे.

इतर बातम्या-

Mumbai | मुंबईत कोरोना संख्येचा विस्फोट, दादर मार्केटमध्ये तुफान गर्दी, मुंबईकरांना गांभीर्य नाही!

Kishori Pednekar | वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंताजनक, मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता : किशोरी पेडणेकर

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष