AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात खडाजंगी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया

जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.

अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात खडाजंगी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया
| Updated on: Aug 07, 2023 | 5:03 PM
Share

औरंगाबाद : येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदपीन भुमरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चांगलेच सुनावले. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. भूमरे यांची बाजू उचलून धरण्याचं काम बाजूला बसलेले अब्दुल सत्तार करत होते. यासंदर्भात बोलताना औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, बैठकीत गोंधळ वैगेरे काही झाला नाही. आम्हाला निधी जास्त द्यावा, अशी अंबादास दानवे यांची मागणी होती. कुणीही अंगावर आले नाही. आम्ही सर्वांना समान निधी दिला आहे. विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलं. माझ्या अंगावर कुणी आलं नाही. जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.

निधी देताना तालुक्याचा विचार केला

ठाकरे गटाला निधी देत नाही का, असा प्रश्न संदीपान भुमरे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, निधी देताना तालुक्याचा विचार केला जातो. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी दिला. ठाकरे गट, उदय राजपूत असा विषय नाही.

हे विरोधी पक्षनेत्याचे काम

आवाज वाढवून बोलणं हे विरोधी पक्षनेत्याचं कामच आहं. विरोधी पक्षनेत्याने आवाज वाढवला नाही, तर त्यांना विरोधी पक्षनेता कोण म्हणेल. कन्नड तालुक्याला जेवढा निधी दिला गेला तेवढा निधी वैजापूर, सिल्लोड, गंगापूर या सगळ्या तालुक्यांना दिला गेला आहे, असंही संदीपान भुमरे यांनी म्हंटलं.

गैरसमज झाला होता

बैठकीत उदय सिंह यांचा गैरसमज झाला होता, असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं. अंबादास दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील निधीचे काही आकडे सांगितले. पालकमंत्र्यांनी तालुक्यानुसार किती निधी दिला हे सांगितलं. त्यानंतर अंबादास दानवे आणि उदय सिंह यांचे समाधान झाले.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.