AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात खडाजंगी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया

जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.

अंबादास दानवे-संदीपान भुमरे यांच्यात खडाजंगी, संदीपान भुमरे यांची प्रतिक्रिया
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 07, 2023 | 5:03 PM
Share

औरंगाबाद : येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि औरंगाबादचे पालकमंत्री संदपीन भुमरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. निधी वाटपावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चांगलेच सुनावले. विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. भूमरे यांची बाजू उचलून धरण्याचं काम बाजूला बसलेले अब्दुल सत्तार करत होते. यासंदर्भात बोलताना औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे म्हणाले, बैठकीत गोंधळ वैगेरे काही झाला नाही. आम्हाला निधी जास्त द्यावा, अशी अंबादास दानवे यांची मागणी होती. कुणीही अंगावर आले नाही. आम्ही सर्वांना समान निधी दिला आहे. विरोधी पक्षाचं काम त्यांनी केलं. माझ्या अंगावर कुणी आलं नाही. जे झालं ते काही भांडण नाही. विरोधी पक्षाचं काम आहे. आम्हाला जास्त निधी द्या, असं म्हणायचं. अंबादास दानवे हे आवाज वाढवून आणि उठून बोलत होते.

निधी देताना तालुक्याचा विचार केला

ठाकरे गटाला निधी देत नाही का, असा प्रश्न संदीपान भुमरे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले, निधी देताना तालुक्याचा विचार केला जातो. सगळ्या तालुक्यांना सारखा निधी दिला. ठाकरे गट, उदय राजपूत असा विषय नाही.

हे विरोधी पक्षनेत्याचे काम

आवाज वाढवून बोलणं हे विरोधी पक्षनेत्याचं कामच आहं. विरोधी पक्षनेत्याने आवाज वाढवला नाही, तर त्यांना विरोधी पक्षनेता कोण म्हणेल. कन्नड तालुक्याला जेवढा निधी दिला गेला तेवढा निधी वैजापूर, सिल्लोड, गंगापूर या सगळ्या तालुक्यांना दिला गेला आहे, असंही संदीपान भुमरे यांनी म्हंटलं.

गैरसमज झाला होता

बैठकीत उदय सिंह यांचा गैरसमज झाला होता, असं अब्दुल सत्तार यांनी म्हंटलं. अंबादास दानवे यांनी त्यांच्या मतदारसंघातील निधीचे काही आकडे सांगितले. पालकमंत्र्यांनी तालुक्यानुसार किती निधी दिला हे सांगितलं. त्यानंतर अंबादास दानवे आणि उदय सिंह यांचे समाधान झाले.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?