AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

HSC, SSC Exams | दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका, सुनावणी कधी?

बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत, असे याआधीच शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. या निर्णयाविरोधात औरंगाबादच्या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली आहे.

HSC, SSC Exams | दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकला, औरंगाबादच्या विद्यार्थ्याची खंडपीठात याचिका, सुनावणी कधी?
| Updated on: Feb 18, 2022 | 2:19 PM
Share

औरंगाबाद | येत्या मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या (SSC, HSC Exams) नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात (Aurangabad High court Bench) दाखल करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सुमित अरविंद पवार या विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली आहे. कोरोना काळात (Covid-19) विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यार्थी तणावात आहेत. अशात शाळाही अनियमित झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला नाही, यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण आले आहे, असे कारण या याचिकेत देण्यात आले आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या नियोजित परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका त्याने कोर्टात दाखल केली आहे.

ऑनलाइन घ्या किंवा पुढे ढकला- याचिका

कोरोना संकटामुळे मागील वर्षभर शाळा अनियमित झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. आता मार्च महिन्यात परीक्षांच्या तारखा घोषित झाल्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपणे आले आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने केलेल्या याचिकेत, दहावी-बारावीची परीक्षा शक्य असेल तर ऑनलाइन घेण्यात यावी अन्यथा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने अभ्यास करण्यासाठी परीक्षा दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच 4 फेब्रुवारी रोजीच्या परीक्षेसंबंधीच्या अधीसूचनेला स्थगिती द्यावी आणि ती रद्द करावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी अपेक्षित आहे. या प्रकरणी अॅड. बाबासाहेब भाले हे याचिकाकर्त्याकडून काम पहात आहेत.

काय आहे परीक्षेचे वेळापत्रक?

बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्चे ते 7 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहेत. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत होणार आहेत.

इतर बातम्या-

Aurangabad Mystery| गांधेली शिवारातील स्त्री-पुरुषाचा मृत्यू होरपळूनच! दोघांचे संबंध काय, अजून रहस्य कायम!

देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.