AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद महापालिका निवडणूकः प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यासाठी उरले फक्त 10 दिवस!

औरंगाबाद महापालिकेत याआधी 115 सदस्य संख्या होती. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानुसार, सदस्यसंख्या आता 126 पर्यंत पोहोचली आहे. तसेच या दृष्टीने शहरात एकूण 42 प्रभाग तयार होतील.

औरंगाबाद महापालिका निवडणूकः प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यासाठी उरले फक्त 10 दिवस!
प्रभाग रचना आराखडा 18 नोव्हेंबरपर्यंत तयार करण्याची मुदत
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 09, 2021 | 2:32 PM
Share

औरंगाबादः महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी सुधारित आदेश जारी केले आहेत. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेकरिता येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता आराखडा तयार करण्यासाठी महालिकेकडे फक्त 10 दिवस बाकी आहेत.

126 सदस्य संख्या 42 प्रभाग

औरंगाबाद महापालिकेत याआधी 115 सदस्य संख्या होती. मात्र राज्य सरकारच्या निर्णयानुसार, सदस्यसंख्या आता 126 पर्यंत पोहोचली आहे. तसेच या दृष्टीने शहरात एकूण 42 प्रभाग तयार होतील. महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे काम पन्नास टक्के पूर्ण केले आहे. उर्वरीत पन्नास टक्के काम पुढील दहा दिवसात प्रशासनाला करावे लागणार आहे.

2011 च्या जनगणनेनुसार रचना

प्रभाग रचनेसाठी महापालिकेने 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी गृहित धरली असून यात मागील दहा वर्षात झालेली नैसर्गिक वाढ गृहित धरून प्रभाग तयार करावे लागतील. 2011 मधील जनगणनेचे प्रगणक गट केंद्रबिंदू मानून प्रभाग तयार होतील. संबंधित प्रभागातील वाढीव लोकसंख्या 10 टक्के गृहित धरली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण वाढीव लोकसंख्या गृहित घरली तर जुन्या वॉर्डांच्या सीमारेषा बदलू शकतात. त्यामुळे महापालिकेला तीन वॉर्डांच्या सीमारेषा लक्षात घेून प्रभाग तयार करावा लागणार आहे. त्यातही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले कडक निकष डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहेत.

प्रभाग रचनेवर राजकीय मंडळींचे लक्ष

महापालिकेत मागील तीन दशकांपासून सलग विजय मिळवणाऱ्या तगड्या मंडळींचे प्रभाग रचनेच्या कामकाजाकडे बारकाईने लक्ष आहे. आपल्या सोयीनुसार, प्रभाग तयार करता येऊ शकतो का, या दृष्टीने या मंडळींनी सूत्रे हलवण्यास सुरुवात केली. मागील महिन्यात मनपाने जेव्हा आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले, तेव्हासुद्धा या मंडळींनी हस्तक्षेपाचे प्रयत्न केल्याचे समजले आहे.

इतर बातम्या-

हिणकस शब्दाचं सोन्याशी काय नातं? वाचा Gold Gyaan मध्ये अन् सोबत औरंगाबादचे सोन्याचे भावही!

आनंदवार्ताः मंदीचे मळभ हटले, पर्यटकांनी बहरली औरंगाबादची अजिंठा लेणी, 3 दिवसात 8 हजारांवर पर्यटक

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?.

अनेकांना वाटत होतं जागा रिकामी झाल्यावर आत जाता येईल, मात्र… अजितदादांच्या जयंती दिनी छगन भुजबळांचा कुणाला टोला?

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा