AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाईटच्या डीपासाठी शेतकरी आक्रमक,अभियंत्याला कार्यालयातच कोंडले, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील घटना

गंगापूर येथील हे विद्युत रोहित्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्या अभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत रोहित्र दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी येतील शेतकऱ्यांची आहे.

लाईटच्या डीपासाठी शेतकरी आक्रमक,अभियंत्याला कार्यालयातच कोंडले, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील घटना
विद्युत रोहित्राच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 16, 2021 | 4:22 PM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील (Gangapur Farmers) शेतकऱ्यांनी अनेक दिवसांपासून स्वतंत्र विद्युत रोहित्र अर्थात लाइटच्या डीपीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलनही केले. मात्र शेतकऱ्यांची मागणी (Gangapur Farmers agitation) मान्य न झाल्यानुळे त्यांनी आज आक्रमक होत आंदोलन केले. वीज पुरवठा नसल्याने पाणीपुरवठ्या अभावी पिके धोक्यात आल्याने शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. आज महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याशी (MSEDCL) त्यांची बाचाबाचीदेखील झाली.

अभियंत्याला कार्यालयात कोंडले

विद्युत रोहित्राच्या मागणीवरून गंगापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले. त्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला कार्यालयातच कोंडले. मागील सहा महिन्यांपासून हे विद्युत रोहित्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंत्यासमोर आक्रमकरित्या आपलं गाऱ्हाणं मांडलं. यावेळी सहाय्यक अभियंत्याशी शेतकऱ्यांचे वाद झाले. यात शेतकरी आणि अभियंत्यादरम्यान बाचाबाची झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले.

Gangapur farmers, Aurangabad

अनेक दिवसांपासून मागणी मान्य होत नसल्याने शेतकरी आक्रमक

वीज नसल्याने पिके धोक्यात

गंगापूर येथील हे विद्युत रोहित्र मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्या अभावी शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत रोहित्र दुरूस्त करून द्यावे, अशी मागणी येतील शेतकऱ्यांची आहे.

इतर बातम्या

WhatsApp वर Friend In Need Scam द्वारे अनेकांची फसवणूक, स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करता येईल?

इथे येऊन अमरावतीत पुन्हा भडका उडवायचाय का? पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा किरीट सोमय्यांना सवाल!

Follow Us
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत