AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona: ओमिक्रॉनचा धसका! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावात 100 टक्के लसीकरण!

जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट घोंगावत असताना लसीकरणात पिछाडीवर असलेल्या औरंगाबादमध्येही वेगाने हालचाल सुरु आहे. मागील दोन दिवसात विविध गावांतील लसीकरणात मोठी वाढ झालेली दिसून आली.

Corona: ओमिक्रॉनचा धसका! औरंगाबाद तालुक्यातील 30 गावात 100 टक्के लसीकरण!
Vaccination
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 5:45 PM
Share

औरंगाबादः कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या विषाणूच्या चिंतेने अवघ्या जगाची चिंता वाढवली असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात मात्र यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला (Vaccination) चांगलाच वेग मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने लसीकरणासाठीचे नियम अधिक कठोर केल्याने विविध गावांमधील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण जिल्ह्यात औरंगाबाद तालुका आघाडीवर असून सर्वाधिक 30 गावांत शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाची काय आहे स्थिती?

मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट दिल्यानंतर मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पातळ्यांवर लसीकरणाला गती मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. लस न घेतलेल्या नागरिकांना पेट्रोल, डिझेल, रेशन, औषधी, प्रवास, पर्यटन आदी कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत, असे आदेश संबंधित विभागांना दिले होते. त्यानंतर सर्वच ठिकाणच्या लसीकरणाला वेग आला. जिल्ह्यात आतापर्यंत 72 टक्के लसीकरण पूर्ण झाले. यात 18.53 लाख पुरुष, 15.21 लाख महिलांचे लसीकरण झाले. यात 18 ते 44 वयोगटात सर्वाधिक 20.43 लाख लोकांनी लस घेतली तर 45 ते 60 वयोगटातील 7.81 लाख लोकांनी लस घेतली. 5.21 लाख जण हे 60 वर्षांवरील लसवंत आहेत. या सर्वांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात रात्रीच्या वेळीही लसीकरण

जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठीही जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामीण भागात सध्या रबी हंगाम पेरणीसह कापूस वेचणी, मिरची तोडणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रावरची लसीकरणाची वेळ बदलून सकाळऐवजी दुपापासून रात्री उशीरापर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे कामे आटोपून आलेल्या नागरिकांना ते अधिक सोयीचे झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचाही लसीकरणाला जास्त प्रतिसाद मिळत आहे.

इतर बातम्या-

Salman Khan | अभिनेता सलमान खानची अहमदाबादमध्ये गांधीगिरी, ऐतिहासिक साबरमती आश्रमाला भेट

सामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील?

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.