AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Why I Killed Gandhi | चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचा औरंगाबाद खंडपीठाकडे कोणता युक्तिवाद?

चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्यात आले असून चित्रपटाच्या प्रसारणाची परवानगी रद्द करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी ही रीट याचिका दाखल केली आहे.

Why I Killed Gandhi | चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचा औरंगाबाद खंडपीठाकडे कोणता युक्तिवाद?
अमोल कोल्हे नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत
| Edited By: | Updated on: Jan 29, 2022 | 10:53 AM
Share

औरंगाबादः नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) जीवनातील प्रसंगांवर आधारीत Why I Killed Gandhi या चित्रपटाच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसतेय. या चित्रपटाला सेंसॉर बोर्डाने मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाऊ नये, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High court) औरंगाबाद खंडपीठातही (Aurangabad bench) या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्यात आले असून चित्रपटाच्या प्रसारणाची परवानगी रद्द करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी ही रीट याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय?

याचिका कर्ते आणि ज्येष्ठ विधिज्ञ विष्णू ढोबळे यांनी 39 पानांची याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा मुहूर्त 30 जानेवारी असा ठरवण्यात आला आहे. 1948 साली याच दिवशी महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चित्रपटाचा दीड मिनिटाचा टीझर राइट इमेज इंटरनॅशनल या निर्मात्या कंपनीने सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात चित्रपटाच्या अभिनेत्याची काही वाक्ये आहेत. याचिकेवरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती अॅड ढोबळे यांनी केली आहे.

दीड मिनिटाची क्लिप प्रक्षोभक- याचिकाकर्ते

याचिकाकर्ते अॅड. विष्णू ढोबळे म्हणाले, घटनेने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. परंतु ते अमर्याद नाही. ज्या राष्ट्रपित्याने भारतीय स्वातंत्र्य चळवळीलाच नव्हे तर अवघ्या जगाला दिशा दाखवली आहे. त्याच्या कार्यावर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु त्याची मानहानी होईल, अशा स्वरुपात चिखलफेक करण्याचा कोणालाही अधिकार नाही. या चित्रपटाची दीड मिनिटाची क्लिप प्रक्षोभक आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

इतर बातम्या-

Pune School Reopen | पुण्यातील शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा; शाळेबाबतच नवे नियम काय? वाचा

सोन्याचा मोह सोडवेना; सोन्याची मागणी 50 टक्क्यांनी वाढली, भारतात सोन्याची मागणी 797.3 टनांवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.