औरंगाबादः जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडीपाठात (Aurangabad bench) आजपासून विविध खटल्यांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, यासाठी वकिलांसह काही न्यायमूर्तींनीही आग्रह धरला होता. मात्र खंडपीठातील काही न्यायमूर्ती आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणी झाली. त्यातील काहीजण बरे होऊन कामावर रुजू झाले असले तरीही पुढील धोका लक्षात घेता आजपासून ऑनलाइन सुनावणी घेण्याचा निर्णय झाला आहे.