AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shocking : चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू

चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्यादिवशीही बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

Shocking : चमोली दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू, बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी, बचाव कार्य वेगाने सुरू
chamoli tragedy Image Credit source: tv9
| Updated on: Aug 14, 2026 | 10:34 AM
Share

उत्तराखंडच्या चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. बोगद्यात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी शिरलं आहे. याच बोगद्यात अडकलेल्या लोकांचा शोध घेणे सुरू आहे. 10 जखमींना गोपेश्वर आणि पीपल कोटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर एका जखमीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल दुर्घटना घडल्यानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या गळ्यापर्यंत पाणी आंल आहे. बोगद्यात ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे बोगद्यातील रेस्क्यू ऑपरेशन थांबण्यात आलं होतं.

उत्तराखंडचे मुख्य सचिव आनंद वर्धन यांनी सांगितलं की, ‘अलकनंदा नदीवर जलविद्य्युत प्रकल्प विकसित करत आहे. हिंदुस्तान कन्ट्रक्शन कंपनीकडे या बांधकामाचे कंत्राट आबे. या प्रकल्पासाठी 3.5 किलोमीटर लांबीचा बोगदा बांधला जात होता. प्रकल्पाचे 70 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्यात बोगद्यात 1.8 किलोमीटरच्या आत गुरुत्वाकर्षणाचे पॅकिंगचं काम सुरू असताना ही दुर्घटना घडली.

नेमकं काय घडलं?

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील निर्माणाधीन बोगद्यात अचानक पाणी आणि चिखल शिरला. ही घटना गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्घटनेवेळी बोगद्यात 18 ते 19 मजूर काम होते. या बोगद्यात वेगाने पाणी आणि चिखल शिरल्याने मजूर आतमध्येच अडकले. या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं. बचावकार्य करत काही मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. काल 16 जणांचा सुखरुपपणे सुटका करण्यात आली.

दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, सीआयएसएफ आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या. या सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे बचावकार्य सुरू केलं. या घटनेची तीव्रता लक्षात घेता इंडो-तिबेटियन बोर्डर पोलीस, भारतीय लष्कर देखील मदतीसाठी पुढे आले आहेत. या बचावकार्याचं काम जिल्हाधिकारी गौरव कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.  ते देखील आता घटनास्थळी उपस्थित आहेत. सर्व यंत्रणांना महत्वाच्या सूचना देण्याचं काम गौरव कुमार हे करत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील या दुर्घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?