AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगजेबाच्या कबरीचा विषय उच्च न्यायालयात, याचिकाकर्त्याची मोठी मागणी

औरंगजेबच्या कबरीला विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र हा दर्जा हटवल्यास महापालिका बुलडोझर लावून ती काढू शकते, असे सांगत लथ म्हणाले, उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का?

औरंगजेबाच्या कबरीचा विषय उच्च न्यायालयात, याचिकाकर्त्याची मोठी मागणी
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 22, 2025 | 1:49 PM
Share

Aurangzeb Tomb Controversy: राज्यात गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीच्या विषयावरुन उलटसुलट वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार झाला होता. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे. औरंगजेबच्या कबरीला दिलेला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जाबाबत याचिका दाखल झाली आहे. हा दर्जा काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमध्ये औरंगजेबचे कबर आहे. या कबरीला 1952 मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, काही नागरिक आणि संघटनांचा यावर आक्षेप घेतला आहे. या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे

याचिकाकर्त्यांपैकी एक असलेले रतन लथ यांनी सांगितले की, औरंगजेब याच्या कबरीबाबत गरज नसताना वाद निर्माण केला जात आहे. ते म्हणाले, मी हिंदू नाही, पण पारशी आहे. देशप्रेमी आहे. औरंगजेब हा क्रूर होता. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला. त्या व्यक्तीच्या कबरीला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देणे चुकीचे आहे. या निर्णयामुळे देशप्रेमी मुस्लिम समाजही अडचणीत आला आहे.

औरंगजेबने एकही चांगले काम केले नाही

औरंगजेब याने चुकीच्या पद्धतीने राज्य केले. त्याच्यासाठी आपण भांडणे का करायची? तो आपला बादशहा नव्हता, मुळात तो आपला नव्हताच. त्याचा जन्म भारतात झाला असेल, तरी देशासाठी त्याने काहीही केले नाही. त्याचा इतिहास बघितला तर एकही चांगली गोष्ट त्याने केलेली नाही, असे रतन लथ यांनी म्हटले.

औरंगजेबच्या कबरीला विशेष दर्जा असल्यामुळे सध्या ही कबर काढणे शक्य नाही. मात्र हा दर्जा हटवल्यास महापालिका बुलडोझर लावून ती काढू शकते, असे सांगत लथ म्हणाले, उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा असा दर्जा द्याल का? दरम्यान, या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष दर्जा हटवण्याची मागणी मान्य झाल्यास पुढील कारवाई कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.